साताराः झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर असलेले धावडशी गाव ऐतिहासीक व धार्मिक आहे. या गावाच्या एकजुटीमुळे येथील पिढी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ही अभिमानस्पद बाब असली तरी सध्या राजकीय श्रेयवाद घेण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या नावाने चुकीच्या पध्दतीने प्रसार होत असल्यामुळे धावडशी ग्रामस्थ व शेतकरी संतप्त भावना व्यक्त करू लागल्या आहेत.
सातार्यातून अवघ्या 12 कि. मी. अंतरावर दक्षिण बाजूला धावडशी गाव मेरूलींग डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. गावची लोकसंख्या सुमारे साडेतीन हजार असून शेती व नोकरी व्यवसाय हेच प्रमुख जगण्याचे साधन आहे. या गावात कोणतीही नदी व कोणत्याही धरणाचा कॉलवा गेलेला नाही. परंतु गेली 100 वर्षापासून या गावातील शेतकरी विहीर व ओढ्याच्या पाण्यावर शेती करीत आलेले आहेत. पुर्वी ब्रम्हेंद्र स्वामी यांनी बांधलेल्या तळ्यातून लोक पिण्याचे पाणी आणत होते. सध्या गावात 10 ते 12 आड व पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत झाली आहे. या गावात कधीही टँकर पाठविण्यात आलेला नाही. तरीसुध्दा प्रसार माध्यमातून जलयुक्त शिवार योजनेमुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा टँकर बंद करण्यात आला. अशी चुकीची माहिती दिली आहे. कारण याबाबत टंचाई कक्षाकडे असलेल्या टँकर पुरवठा करणार्या गावच्या यादीत धावडशीचा उल्लेखच नाही. गावात जलयुक्त शिवार योजनेचे काम स्वयंस्फुर्तीने करण्यात आलेले आहे. धावडशी गावात सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्या संकल्पनेतून विहीरजोड प्रकल्प राबविला. तो यशस्वी होवू शकला नाही. त्यालाही त्यावेळी राज्यभर धावडशी गावच्या विहीरजोड प्रकल्प गाजला होता. पण काही अभ्यासक हा प्रकल्प पहाण्यास आल्यानंतर त्यांच्या दृष्टीस पडला नाही. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून धावडशी डोंगर परीसरात बंधार्यांची कामे झाली आहेत. डोंगर उतारामुळे विहीरींच्या पाण्याची पातळी वाढ होणे स्वाभावीक आहे. ते कुणीही नाकारत नाही. परंतू कृषी विभाग, प्रसार यंत्रणा व शासकीय अन्य योजना यांना मात्र निधीचा फायदा होत आहे. याच निधीतून दर सहा महिन्याला गवगवा करणारी मालिका लावली जाते. त्यामुळे आता धावडशीतील युवक व शेतकरी संतप्त झालेले आहेत. ज्यांनी शेतात बांधावर बसून देखरेख केली किंवा ज्या महिलेने कधीही टँकरचे पाणी स्वत: पाहिले नाही अशा लोकांची दिशाभूल करून त्यांच्याकडून जलयुक्त शिवार योजनेचे यश मिळाले असे प्रसारीत करून न केलेल्या कामाचे श्रेय लाटले जात आहे. याची आता विरोधी पक्षाने धावडशी गावाला भेट देवून पहाणी करावी अशी मागणी गावातील युवक व शेतकरी वर्गातून केली जात आहे.
जलयुक्त शिवाराच्या चुकीच्या प्रसाराने धावडशी ग्रामस्थ संतप्त
RELATED ARTICLES