रहिमतपूर: आपल्या जिल्ह्याला थोर साहित्यिकांची मोठी परंपरा आहे. कवी, यशवंत, गिरीश, ना ह. आपटे, बा. सी. मर्ढेकर, वसंत कानेटकर, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, श्री. म. माटे, यशवंतराव चव्हाण, पट्टे बापूराव, अण्णाभाऊ साठे या साहित्यकांनी जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचविले आहे. असे कवी, साहित्यिक या मातीत पुन्हा जन्माला यावेत. त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेल्या साहित्याचा सुगंध सर्वत्र दरवळत राहावा अशी अपेक्षा सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली. रहिमतपूर ता. कोरेगाव येथे मकवी गिरीश शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष सांगता समारंभानिमित्त स्नेहमेळावा, सत्कार समारंभ व पुस्तक प्रकाशन सोहळा अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार, सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, डॉ. राजेंद्र शेंडे, जयवंत गुजर, विनिता आपटे, प्रा. अरुण कानेटकर, कात्रज दूध डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक क्षीरसागर, डॉ. अरुण पवार, अभिनेते विजय निकम, शहाजी क्षीरसागर, संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव माने, परशुराम फडतरे, संस्थापक सचिव अरुण माने, सचिव सौ. स्मिता पवार, आशा भोसले यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मकमंडलूचा माथा – वासनेची गाथा खंड दोन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. राजेंद्र सरकाळे, जयवंत गुजर, सुनिताराजे पवार, विनिता आपटे यांनी मनोगत व्यक्त केले.विकास पवार यांनी सूत्रसंचालन केले. केशव माने यांनी आभार मानले. कार्यक्रमास शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
साहित्याचा सुगंध सतत दरवळत रहावा : माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील
RELATED ARTICLES