Tuesday, February 24, 2026
Homeठळक घडामोडीपाकिस्तानची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केले दहन बॉम्बे रेस्टाँरंट चौकात ब्ल्यू फोर्सने...

पाकिस्तानची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केले दहन बॉम्बे रेस्टाँरंट चौकात ब्ल्यू फोर्सने केले आंदोलन

सातारा : पुलवामा येथील घटनेच्या निषेधार्थ ब्ल्यू फोर्सने पाकिस्तानची अंत्ययात्रा काढून बॉम्बे रेस्टाँरंट पुलाखाली प्रतिकात्मक पुतळयास जोडे मारुन तुडवून दहन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचाही सहभाग होता. हे आंदोलन ब्ल्यू फोर्सचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. दरम्यान, पाकिस्तानने असे भ्याड हल्ले करण्यापेक्षा समोरासमोर येवून लढा, आम्हालाही आत्मघातकी पथके आता तयार करावी लागतील अन् पाकिस्तानात घुसवावी लागतील, असा सज्जड इशाराच दिला आहे.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ, रवी शेडगे, रवी बाबर, राजेंद्र शेडगे, महेश मोरे, वाईचे संतोष जाधव, सुभाष भिसे, श्रीकांत ओव्हाळ, राजेश ओव्हाळ, किरण पवार, दत्ता निकम, राकेश जाधव, अमित मोरे, योगेश माने, रमेश मोरे, गणेश मोरे, भगवान कदम, निलेश चाळके, शिवसेनेचे सातारा तालुका उपप्रमुख रमेश बोराटे, वाहतूक सेनेचे सचिन जगताप यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळयाची अंत्ययात्रा कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, अशा घोषणा देत बॉम्बे रेस्टाँरंट पुलाखाली आणली. कार्यकर्ते आक्रमक झाले होते. घोषणा देत कार्यकर्त्यांनी पायातील चप्पलने थेट प्रतिकात्मक पुतळयास बडवण्यास सुरुवात केली. पाकिस्तानचा झेंडयासह पुतळयास जाळण्यात आले.
यावेळी बोलताना दादासाहेब ओव्हाळ म्हणाले, काल प्रेमाचा दिवस साजरा देशभरात होत होता. असे असताना पूर्ण जगभरात मैत्रीचा संदेश सांगत असताना पाकिस्तानी मनुवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. भ्याड हल्ला बांडगुळांनी केला आहे. आत्मघातकी हल्ला केला आहे. या देशाच्या हक्कासाठी लढणारे सैनिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहु, फुलेचा वारसा सांगणारी मंडळी आम्ही आहोत. असले हल्ले आम्ही खपवून घेणार नाही. दहशतवाद्यांनी हल्ला करुन आम्हाला डिवचले आहे. समोरासमोर लढा. पाठीमागून लढू नका, भारत ही बुद्धाला मानणारी भारत भुमी आहे. भ्याड हल्ला करुन आम्ही निरपराधांना मारणार नाही. भारतामधील जर रिपाइं सैनिक, शिवसैनिक पाकिस्तानात चालत गेले. तरी पाकिस्तान रहायचे नाही. पाकिस्तान भाव म्हणायचा लायकीचा नाही. या सरकारने कठोर निर्णय घ्यावा. चमडी बचाव भूमिका घेवू नये, शासनकर्त्या जमातीने खराखरा सर्जिकल स्ट्राईक करावा, भारतासाठी आम्हाला सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल, असाही इशारा दिला. दरम्यान, शहीदांच्या आत्म्याला शांती मिळाली. आम्ही त्यांच्या दुखात सहभागी आहोत, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular