वाई : आजच्या धगाधगीच्या काळात माणसाला स्वास्थ्य मिळणे कठीण होत चालले आहे, दररोज नियमित व्यायाम केल्यास जीवनात येणार्या संकटांना सामोरे जाण्याची उर्जा मिळते, शरीर निरोगी रहाते, यासाठी आजच्या तरुणांनी शिक्षणाबरोबर व्यायामाकडे वळावे असे प्रतिपादन वाई तालुक्याचे जननायक- आमदार मकरंद पाटील यांनी वेलंग येथील व्यायाम शाळेच्या उद्घाटन समारंभात बोलताना केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस- प्रतापराव पवार, जिल्हा सरचिटणीस- अशोकराव सरकाळे, पंचायत समितीच्या सभापती- सौ. रजनीताई भोसले, सदस्य- पै. विक्रांत डोंगरे, नेहरू युवा सामाजिक मंडळाचे अध्यक्ष-अनिल पाटणे, मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष- रमेश गोळे, सुनील जेधे, दिलीप गोळे, माजी सरपंच- सदाशिव हगवणे, माजी उपसरपंच- ज्ञानदेव जेधे, देवराम पाटणे, बाजीराव सणस, गणेश जाधव, किशोर जेधे, बाळकृष्ण साळेकर, संतोष महांगडे, नारायण राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. मकरंद पाटील म्हणाले, वाई च्या पश्चिम भागात युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य असताना आपण त्यांच्या अंगी असणारा एक तरी गुण जोपासल्यास खर्या अर्थाने केवळ नाव घेवून चालणार नाही तर त्यांच्यातील एकतरी गुण आत्मसात केल्याचे समाधान मिळेल.
सोशल मिडीयावर जास्तीजास्त वेळ घालविणार्यो आजच्या पिढीने खेळांकडे वळले पाहिजे,खेळामुळे जीवनात यशापयश पचविण्याची ताकद निर्माण होते. मुलांनी मैदानावर येवून दरराजे खेळले पाहिजेच पण त्याच बरोबर शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आजची पिढी तासनतास मोबाईमध्ये गुंतून पडली आहे. त्यामुळे पालक व मुलांमधील संवाद संपला आहे. नैराश्य, आजारपण, मानसिक तणावामुळे त्यात अधिक भर पडत चालली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यायामशाळा प्रत्येक गावांत उघडणेगरजेचे आहे. सुनील रामचंद्र जेधे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ व्यायाम शाळेसाठी जी मोफत जमीन दान करून समाज हिताचे कार्य केले आहे.असेही आमदार मकरंद पाटील म्हणाले.यावेळी वेलंग पंचकृशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निरोगी शरीरासाठीआजच्या तरुणांनी व्यायामाकडे वळावे:आ.मकरंद पाटील
RELATED ARTICLES