फलटण: फलटण नगरपरिषदेचा स्वच्छ भारत अभियानात 75 वा नंबर आलेला असून फलटणकर नागरिकांचा मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद पाहता पुढील अभियानत अव्वल नंबर येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संपूर्ण भारतातील स्वच्छ 1002 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 88 स्वच्छ शहरे असून त्यामध्ये सातारा जिल्हातील 10 शहरे आहेत फलटणकर नागरिकांनी ओला व सूका कचर्याचे वर्गीकरण चांगल्या प्रकारे केल्यामुळे हा नंबर वर सरकला आहे.फलटण नगरपरिषदने गत वर्षात स्वच्छ भारत अभियानात भाग घेतला होता. या अभियानात फलटण नगरपरिषदेचा 238 वा नंबर आला होता. सर्व महाराष्ट्रात स्वच्छ अभियानात भाग घेतलेल्या इतर नगरपरिषदेच्या तुलनेने फलटण नगरपरिषदने उशीरा सुरुवात केली होती. मागील अभियाना पेक्षा या अभियानात सर्वात महत्त्वाचे म्हणजे फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर हे नवीन बदलून आलेले होते त्यांची एकदंरीत काम करण्याची पद्धत सर्वांना बरोबर घेऊन करण्याची आहे. नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष आरोग्य समितींचे सभापती सर्व नगरसेवक नगरसेवकांची साथ प्रशासनास मिळाली होती . सर्वांनीच जण झोकून देऊन स्वच्छतेचे काम केले होते .आरोग्य कर्मचार्यांनी चांगली साथ दिली होती. त्यात भरीस भर म्हणून नुकत्याच फलटण नगरपरिषदेला शासनाच्या वतीने नवीनच 16 घंटागाड्यां आलेल्या आहेत स्वच्छतेची नाङी एकच घंटागाङी असे सुञ आहे. त्यामुळे फलटण शहरातील कचरा मोठ्या प्रमाणात ओला सुखा असा वेगवेगळ्या पद्धतीने उचलला जात आहे.
नागरिकांना सुद्धा आता स्वच्छतेची महती समजू लागली आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे विधान परिषदचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काही खाजगी संस्थेच्या सहकार्याने फलटण नगरपरिषदेला सर्वोतोपरी सहकार्य देऊ केले आहे.त्यांचे स्वच्छता दूत नागरिकांचे समुपदेशन करुन स्वच्छतेच्या बाबतीत सर्वच कामप्रामाणिकपणे करीत असल्याचे दिसून आले.शहरातील बर्याच ठिकाण च्या कचरा कुंङ्या उचलून तेथील भाग सुशोभित करण्यात आलेला आहे.प्रभाग निहाय आरोग्य विभागा चे सर्व कर्मचारी एकञितरित्या लावून कचरा राङारोङा उचलला जात आहे.नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष आरोग्य समितीचे सभापती सर्वच नगरसेवक ,नगरसेविका मुख्याधिकारी, सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासह विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मार्केट कमिटीचे चेअरमन व जेष्ठ नगरसेवक श्रीमंत रघूनाथराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी सुद्धा फलटण नगरपरिषदेचा स्वच्छाग्रह अभियानात पहिला नंबर यावा यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे व सर्वांनीच मानसिकता केल्यामुळे पुढील वर्षी नक्कीच नंबर येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
फलटणकर नागरिकांचा स्वच्छ भारत अभियात उत्कृष्ट प्रतिसाद
RELATED ARTICLES

