मायणीःता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)स्त्रीच्या अंगी धाडस, जिद्द व ईच्छाशक्ती हे गुण असले तर ती अवकाशाला गवसणी घालेल, असे प्रतिपादन प्रा.द्रौपदा कणसे यांनी केले.
कलेढोण येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित
कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी चेअरमन संजीव
साळुंखे, निर्मलाताई साळुंखे, सुजाता महाजन आदी उपस्थित
होते. दरम्यान, पुणे येथील वीरभद्र एंटरप्राइजेसचे
काकासाहेब देशमुख यांनी स्वयं रोजगाराबाबत मार्गदर्शन केले.
चेअरमन संजीव साळुंखे म्हणाले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना समानतेचा हक्क दिला. समाजभूषण हणमंतराव साळुंखे पतसंस्थेने बचत गटाच्या महिलांना आर्थिक आधार दिला आहे. दरम्यान एक कर्तृत्ववान महिला म्हणून प्रा. दौपदा कणसे यांचा तर पाणलोटचे काम उत्कृष्ट केल्याबद्दल सुजाता महाजन यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन सौ. सुमेधा कुलकर्णी यांनी केले. प्रास्तविक गितांजली वरुडे यांनी केले.