Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीफलटण शहरातील 9 जणांच्या टोळीवर तडीपारीची कारवाई 48 तासाच्या आत जिल्ह्याबाहेर जाण्याचे...

फलटण शहरातील 9 जणांच्या टोळीवर तडीपारीची कारवाई 48 तासाच्या आत जिल्ह्याबाहेर जाण्याचे आदेश

फलटण : फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत फलटण शहरात गर्दीमारामारी करुन दुखापत, शिवीगाळ, दमदाटी करणारी आणि ग्रामीण भागात शेतकर्‍यांचे शेतातील विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरणार्‍या 9 जणांच्या टोळीवर तडीपार कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. दरम्यान 48 तासाचे आत त्यांना सातारा जिल्हा हद्दीबाहेर गेले पाहिजे असाही आदेश केला आहे. या धडक कारवाईचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे जात असून गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की मारामारी, दुखापत करणार्‍या टोळीचा प्रमुख नवनाथ तात्याबा कर्चे, वय- 46 वर्षे, साथीदार विठ्ठल तात्याबा कर्चे, वय -44 वर्षे, अक्षय नवनाथ कर्चे, वय -23 वर्षे, अमित नवनाथ कर्चे, वय -20 वर्षे, अवधुत विठ्ठल कर्चे, वय 19 – वर्षे, सर्व रा.अलगुडेवाडी, ता.फलटण, जि. सातारा. अशी टोळी तयार झाली होती त्यांनी फलटण शहरात गर्दीत मारामारी करुन दुखापत, शिवीगाळ, दमदाटी करुन नुकसान करणे, सरकारी कामात अडथळा आणुन दरोडा टाकणे, दुखापत करुन शिवीगाळ दमदाटी करणे, असे गुन्हे केलेले आहेत. त्यांना तेजस्वी सातपुते हद्दपारप्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 अन्वये सातारा जिल्हा हद्दीतुन 2 वर्षे (दोन वर्षे) या कालावधी करीता हद्दपार करण्याचा आदेश दिले आहेत.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत शेतकर्‍यांचे शेतातील विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरणार्‍या टोळीचा प्रमुख रामदास विनायक मंडले, वय-46 वर्षे, टोळी सदस्य गणेश श्रीमंत माने, वय -19 वर्षे, आर्यन शंकर कांबळे, वय -19 वर्षे, रोहीत ऊर्फ भैय्या प्रकाश लोंढे, वय -22 वर्षे, सर्व रा. सांगवी मायनर, ता.फलटण, जि. सातारा. अशी टोळी तयार झाली होती त्यांनी फलटण परिसरातील शेतकर्‍यांच्या विहीरीवरील पाण्यातील मोटारी चोरीचे गुन्हेनकेलेले आहेत. त्यांना तेजस्वी सातपुते हद्द पारप्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 अन्वये सातारा जिल्हा हद्दीतुन 01 वर्षे (एक वर्षे) या कालावधी करीता हद्दपार केले बाबतचा आदेश केला आहे.
वरील दोन्ही टोळयांना वेळोवेळी सुधारणेची संधी देवुनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधुन त्यांचेवर कडक कारवाई करणे करीता मागणी होत होती.त्यामुळे त्यांचे कडुन फलटण तालुका हद्दीत हिंसक घटना घडुन भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवु नये म्हणुन वरील दोन्ही टोळीतील 9 इसमांना हद्दपार करणे बाबत फलटण शहर व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे कडुन तेजस्वी सातपुते, हद्दपारप्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे प्रस्ताव सादर केले होते. सदर हद्दपार प्रस्तावाची सुनावणी होवुन पोलीस अधीक्षक यांनी वरील प्रमाणे हद्दपार आदेश केलेले आहेत. आदेशाची बजावणी झाल्यानंतर 48 तासाचे आंत त्यांना सातारा जिल्हा हद्दीबाहेर गेले पाहिजे असाही आदेश केला आहे. या कारवाईचे सर्व स्थरातुन समाधान व्यक्त होत आहे. सातारा जिल्हयात अशाच प्रकारे समाजामध्ये भिती, दहशत पसरविणार्‍या गुंडांचे व चो-या, मारामारी, करणा-यांचे विरुध्द त्वरीत कारवाई करणेत येणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular