म्हसवड : श्रीमंत राजे मल्हारराव होळकर यांनी सर्व समाजासाठी कार्य केले.परंतु त्यांच्या मागे गेली 70 वर्षो बहुजन समाजावर अन्याय होत गेला आता तर भाजपा सरकारनं कहरच केला धनगर असो अथवा मुस्लिम या समाजास आरक्षणाचं गाजर दाखवुन फसवलं म्हणून भाजप चले जाव हाच एकच नारा बहुजनाचा संघटीतपणे राहिल यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन बेल भंडारा विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रमोद गावडे यांनी केले.
धनगर समाजातील पराक्रमी योघ्दा,प्रथम सुभेदार,स्वराजाची पताका अटकेपार नेणारे श्रीमंत राजे मल्हारराव होळकर यांची 326 वी जयंती निमित्त येथील महात्मा फुले चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मारुती केसकर,माजी नगरसेवक दीपक बनगर प्रा.सचिन होनमाणे, दिनेश हुबाले,अशोक राजगे, बाळासाहेब मासाळ, किशोर सोनवणे, सोमनाथ कबीर, प्रा.तोरणे,श्री. चंदनशिवे, दादासाहेब सारतापे, दुर्योधन कोळेकर, रामदास मासाळ, आप्पा साहेब पुकळे, सजगणे सर, पै.संजय खोत, पै.पोपट रुपनवर,अरुण विरकर,डॉ. विजयकुमार माने, धनाजी विरकर,लुणेश विरकर, विशाल कोकरे, अकिल काझी, मारुती झिमल,विलास शेम्बडे,संजय गोरड, संजय वाघ,पोपट बिडगर,अशोक गोरड, मारुती मोटे, तानाजी दोलताडे कवी बाबासाहेब कोकरे, अड.विजयराव हिरवे, इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
डॉ.गावडे म्हणाले, सामाजिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या म्हसवड येथे श्री.होळकर यांची दुसरी जयंती साजरी करीत आहोत.पुढील वर्षी या जयंतीचे भव्य स्वरुप पाहावयास मिळेल.
प्रा.सचिन होनमाने म्हणाले राजे मल्हारराव याचं नाव घेताच छत्रपती शिवाजी महाराजीचं नाव येतं आमचा समाज झोपेचं सोंग घेत आहे त्यांना जागं करणं गरजेचं होते.
प्रा.सजगाने म्हणाले की,राजे मल्हारराव होळकर यांचा जन्म म्हसवड येथील विरकरवाडी येथे झाला आहे.ते मुळचे येथीलच असुन त्यांचे मुळ आडनाव विरकर आहे. ते मामाच्या गावी होळ गावी राहिल्यामुळे ते होळकर नावानेच सर्व परिचित झाले. पेशवाई काळात तब्बल 52 लढाया जिंकणार हा म्हसवड परिसरातील शुर असे लढवय्ये होते.पुणे ते इदोरला गेले त्यांना जागीरी मिळाली. मल्हाररावाच्या सुनेनं साडे एकोन्निस वर्षे राज्य केले.विशेष म्हणजे मल्हारराव होळकर यांनी सर्व समाजासाठी कार्य केले.
किशोर सोनवणे म्हणाले,धनगर समाजाची राजकारणात व त्यानंतर आरक्षणातही वेळोवेळी फसवणुक होत आली आहे. मल्हारराव होकर यांची विचारसरणी आचरणात आणतो यावरच समाजाची जागृती ठरत असते. यावेळी मारुती केसकर,बाबासाहेब मासाळ,प्रा.चंदनशिवे,प्रा.तोरणे इत्यादींची भाषणे झाली.
मल्हारराव होळकर यांनी सर्व समाजासाठी कार्य केल : गावडे
RELATED ARTICLES

