म्हसवड : कडक उन्हाळ्यात पक्षाची पाण्याची व भुकेसाठी धडपड पाहून दुष्काळी उत्तर माण तालुक्यातील येळेवाडी गावातील दडसवाडा वस्तीवरील बापूराव दडस या शेतकर्यांने उन्हाळ्यात कमी पाण्यावर ज्वारी, गहू, हरभरा या पिकाचे उत्पादन न घेता अर्धा एकरावर बाजरीचे पिक घेऊन पक्ष्यांना अन्नधान्याची व पाण्याची सोय केली आहे. झाडांवरही पाण्याने भरलेले भांडे ठेवली आहेत. या परिसरातील पक्षी बाजरीचे कणसं खाण्यासाठी शेतात दुष्काळी परिसरातील पाणवठे, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात पक्षांना खाण्यासाठीही काही अन्नधान्य व पाणी मिळत नाही. पक्ष्यांच्या खाण्याची व्यवस्था होण्यासाठी बाजरीचे पिक राखले आहे. या परिसरातील पक्ष्यांच्या जगण्यासाठी अमुल्य ठरत आहे.
दुष्काळामुळे पाणी आणि अन्नासाठी पक्ष्यांना मदत करण्याची गरज आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी, अन्न आणि निवार्याची व्यवस्था करणे गरजचे आहे. पाण्यासाठी सध्या पक्षाची धडपड सुरू आहे. किमान गरजेपुरते पाणी मिळावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नातून पक्ष्यांनाही मदत होईल असे काम करणे गरजेचे आहे. आपल्या घराच्या अवतीभोवती, परिसरात पक्ष्यांसाठी छोटी घरटी तयार करणे किंवा त्यांना निवारा तयार करून देणे गरजेचे आहे. चिमणी आणि बुलबुल यांच्याशिवाय अन्य पक्षांचेही आवाज ऐकू येऊ लागलेत. दुष्काळी भागातून पक्षी आपल्याकडे येत आहेत. त्यांना अधिकाधिक सुविधा कशा उपलब्ध होतील या दृष्टीने ही मदत महत्वाची ठरेल.
या बाजरी पिकामुळे मोर, कबूतरे, चिमणी, कावळे मैना, पोपट, चितुर, यांसारखे असंख्य पक्षी ठिकाणी पाण्यासाठी येत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने या सर्व वन्यजीवांना पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे.
नागरी वस्तीकडे येणारे बहूतांश प्राणी, पक्षी पाणी आणि अन्नाच्या शोधातच येतात. त्यामुळे त्यांना ते जंगलाच्या परिसरातच उपलब्ध झाले तर त्यांचे नागरी वस्तीकडे येणारे प्रमाण कमी होईल. जंगलांसह नागरी वस्तीत काय नागरिकांना अनेक गोष्टी करता येतील.
लोकांनी माणूसकी म्हणून घर, बाग, रस्ता ऑफिस, सार्वजनिक ठिकाणी, बागेत एखादी कुंडी, पाण्यासाठी एखादे पसरट भांडे ठेवले, तसेच उरलेले अन्न ठेवले तर आपल्या घराजवळ बगीच्याकडे येणार्या पक्षाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. यामध्ये पाण्याचे कुंड, पसरट भांडे उंचावर, थोडे सावलीत ठेवावे. त्याठिकाणीच अन्न, कण्या, धान्य न ठेवता ते बाजूला ठेवावे, जेणेकरून मुंग्या लागणार नाहीत. लोकांना घराच्या सावलीत पाण्याने भरलेले भांडे ठेवावे. शक्य झाल्यास त्या शेजारी धान्य टाकावे. पक्षांसाठी घरातील उरलेले अन्न सावलीत ठेवावे. पक्षांसाठी सावली करून त्यात पाणी ठेवावे. झाडांवरही पाण्याने भरलेले भांडे ठेवावे.
मुक्या जिवांच्या भुकेसाठी, ऐन उन्हाळात बाजरीची कणसं राखली पक्षासाठी
RELATED ARTICLES