पाटण : तामकडे, (ता. पाटण) येथे बुधवार दि. 20 रोजी माळरानावरील जनावरांच्या गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत तब्बल 6 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. तर 6 जनावरे पूर्णपणे आगीत होरपळल्याने 90 टक्के च्या वर बाजली आहेत. या जनावरांची मृत्यू ची झुंज सुरु आहे. आगीत राजाराम बापू पवार वय 48 या शेतकर्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचा पंचनामा महसूल विभागाने तर जनावरांचा पंचनामा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केला असून या आगीत एकूण पाच लाख चौदा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या आगीत राजाराम पवार यांचे सर्व पशुधन जळाल्याने शेतकर्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जळीतग्रस्त शेतकर्याला जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
बुधवारी दुपारी 12. 30 वाजता खळ्याचा माळ नावाच्या शिवारात असणार्या राजाराम बापू पवार यांच्या मालकीच्या जनावरांच्या शेडला अचानक आग लागली. घरापासून काही अंतरावर हे शेड असल्याने आग लागलेली कोणाला समजली नाही. मात्र काही वेळानंतर होरपळलेल्या अवस्थेत काही जनावरे गावाच्या दिशेने पळत आल्यावर शेडला आग लागल्याचे ग्रामस्थांना समजले. त्यानंतर ग्रामस्थांनी जनावरांच्या दिशेने धाव घेतली व अग्निशामक विभागाला कळविले. मात्र वार्याचा वेग जास्त असल्याने आग भडकली.
या आगीत 2 गाभण म्हैस, 1 बैल, 2 गाई, 1 वासरू, यांचा जागीच मृत्यू झाला. तर 5 बैल, 1 वासरु 90 टक्के च्या वर बाजल्याने त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. त्यांच्यावर पशुधन अधिकार्यांनी तातडीने उपचार सुरु केले आहेत. मात्र ती हि जास्त काळ जगू शकणार नाहीत असे त्यांनी सांगितले. या आगीत शेतकर्याचे संपूर्ण पशुधन जळून गेल्याने या आगीत सुमारे 5 लाख 14 हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या जळीतग्रस्त शेतकर्यांला तामकडे ग्रामस्थांनी तातडीने 20 हजार तर जोतीबाची वाडी येथील ग्रामस्थांनी 10 हजार रुपयांची मदत केली आहे. या शेतकर्यांना कोणी मदत करणार असेल त्यांनी दिपक मांडवकर- 9923 7344 28, संजय पाटील- 2623 8424 73 यांच्याशी संपर्क करावा. अथवा बँक ऑफ महाराष्ट्र च्या अ/उ छे – 6026 6564 728 या नंबर वर मदत करावी असे अहवान तामकडे ग्रामस्थांनी केले आहे.
तामकडे येथे जनावरांच्या शेडाला आग; 6 जनावरांचा जागीच मृत्यू 6 जनावरे 90 टक्के बाजल्याने गंभीर.
RELATED ARTICLES