वाई : वाईतील कृष्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साठली असून शहराच्या विविध ठिकाणाहून येणार्या सांडपाण्यातून प्लास्टिक कचरा जास्त प्रमाणात येत असल्याने नदी पात्रात प्लास्टीकचा ढीग पडला आहे.तसेच दोन्ही बाजूने सांडपाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा नदीचे पावित्र्य नष्ट होत असून कृष्णा नदीच्या स्वच्छतेलाच आव्हान मिळतयहोते.महागणपती मंदिरासमोर नदी पात्रात बांधकाम करू नये असे राष्ट्रीय लवादाने नोटीस देवून चालू असलेले काम बंद करण्यात आले होते.
वाईकर नागरिकांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने वाईमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल या लवादाच्या आदेशावरून नदी पात्राची सत्यता पडताळण्यासाठी स्वतः पाहणी करण्यासाठी आल्या असता नाकावर रुमाल धरून त्यांना पाहणी करावी लागली होती.
त्यावेळी जिल्हाधिर्यांनी नदी स्वच्छतेविषयी काही सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने वाई नगरपालिका प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने कृष्णा नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली.
कृष्णा स्वच्छतेसाठी समाजातील काही संस्थांनी आपली कंबर कसली आहे.या संस्था सुध्दा एकाच बाजूची स्वच्छता करीत असल्याने दुसर्याबाजूने नदीपात्रात डायरेक्ट सांडपाणी येत असल्याने अनेकठिकाणी जलपर्णीच्या वनस्पतीने डोके वर काढले होते.
त्यातच काही संस्थांनी नदी पात्रात काम करण्यात येवू नये यासाठी राष्ट्रीय लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली आहे.
याचिका दाखल कर्ते राहतात पुण्यात कळवळा मात्र वाईतील कृष्णा नदीचा, त्यातच जलपर्णीची त्सुनामी कधी नदी पात्र काबीज करेल याची शाश्वती देता येत नव्हती. त्यात जी संस्था नदी स्वच्छतेचे काम करते ते सदस्य संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या कामावर मर्यादा पडत होत्या.
स्वच्छतेच्या कामात वाईकरांचा शून्य प्रतिसाद मिळत असल्याचे कृष्णा नदीच्या स्वच्छतेचे आवाहन निर्माण झाले आहे. आज पालिका प्रशासनाने स्वच्छते विषयी जिल्हाधिकार्यांच्या आदेशावरून का होईना कृष्णा नदी स्वच्छता मोहीम हाती घेवून प्रचंड दुर्गंधी सुटलेल्या परीसराची स्वच्छता केली. त्यामुळे वाईकरांनी सुटकेचा स्वास घेत पालिका प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.
वाई नगरपालिकेने कृष्णा नदीत राबविली स्वच्छता मोहीम
RELATED ARTICLES