सातारा : शेतकर्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. उद्योग-व्यापार अडचणीत आहे. त्यामुळे बेरोजगारीची प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. चलनवलन ठप्प असल्याने आर्थिक मंदीचे सावट आहे. देशात कठिण परिस्थिती निर्माण झाली असताना उदयनराजेंसारखे नेतृत्व् दिल्ली पाठविण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या गवई गटातर्फे श्री. छ. उदयनराजे भोसले यांना पाठींबा जाहीर करत आहोत, अशी घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (गवई गट)चे जिल्हाध्यक्ष ड. प्रभाकर कांबळे व पक्ष निरीक्षक हेमंत भोसले यांनी दिली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे (गवई गट) येथील पदाधिकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांची सातार्यात भेट घेत हा पाठिंबा जाहीर केला. गवई गटाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत सरकारच्या धोरणांमुळे पिचलेल्या जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरिता आवाज उठविण्याची ग्वाही श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.
यावेळी पक्ष निरीक्षक हेमंत भोसले म्हणाले, सध्याची देशातील राजकीय परिस्थिती पाहता सक्षम नेतृत्व दिल्ली पाठविण्याची गरज आहे. सर्वसामान्यांचा नेता, लोकांच्या मनावर राज्य करणारे उदयनराजेंसारखे दुसरे नेतृत्व नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पाठींबा देत आहोत. सातारा जिल्ह्यातील रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे कार्यकर्ते उदयनराजेंचा एक दिलाने प्रचार करुन त्यांना निवडून देतील.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, ड. दत्ता बनकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई गट) कार्याध्यक्ष संजय गाडे, मार्गदर्शक चंद्रकांत कांबळे, सचिव सुहास मोरे, संतोष सपकाळ, जिल्हा संघटक दिपक कदम आदी उपस्थित होते.
आरपीआय गवई गटाचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा
RELATED ARTICLES