Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीअन्यायाविरोधात आवाज उठवणे हि जर दहशत असेल तर ती मी नेहमी...

अन्यायाविरोधात आवाज उठवणे हि जर दहशत असेल तर ती मी नेहमी करणार : छ.उदयनराजे भोसले

पाटण: आमच्या बाबतीत प्रचार करताना आम्ही जिल्ह्यात दहशत माजवतो असा कांगावा विरोधक आमच्या बाबतीत करत असतानाच आमचा प्रश्न विरोधकांना आहे. दहशत कोणाला म्हणता? काय दहशत केली? कामगार आणि कष्टकर्‍यांसाठी काम करतोय म्हणजे दहशत का? एम,आय,डी,सी तील कामगारांसाठी प्राधान्य मागण्यांसाठी केलेली कामे म्हणजे दहशत का? महिला- मुली बाळांच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करावा का? अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हि जर दहशत असेल तर ती मी नेहमी करणार.. असे छ. उदयनराजे भोसले यांनी पाटण येथे झालेल्या विद्यार्थी संवाद मेळाव्यात व राष्ट्रवादी कार्यकर्ता बुथ कमिटी मेळाव्यात बोलताना सांगितले.
पाटण स्पोर्ट्स क्लबच्या स्टेडियमवर राष्ट्रवादी काँग्रेस बुथ कमिटी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी मंत्री शशिकांत शिंदे, सत्यजितसिंह पाटणकर, सारंग पाटील, रमेश पाटील, हिंदुराव पाटील, सम्रुध्दी जाधव, बापुराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
छ. उदयनराजे भोसले आपल्या भाषणात पुढे म्हणाले या निवडणूकीतला भाव सर्वांनी जाणून घेतला पाहिजे. निवडणुकीत विषय विजय-पराभवाचा नाही. तर विषय आहे या देशाच्या अस्मितेचा. या देशातील लोकशाहीचा विसर या सत्तेतील लोकांना पडला आहे. गांधीजींची पंचायत राजची संकल्पना या सरकारने गायब केली आहे. नोटबंदीच्या काळात सर्वसामान्य कष्टकर्‍यांचे कष्टाचे पैसे या सरकारने हिसकावून घेऊन शेतकर्‍यांची गळचेपी केली. मन की बात मधे केलेल्या फसव्या असवासनांनी लोकांना फसवले आहे. या फसवेगिरीला सत्तेतून हद्दपार करण्याची हि निवडणूक आहे.
छ. उदयनराजे भोसले यांनी नेहमीच्या सहैलीत भाषण करताना पुढे म्हणाले मी म्हणजे सत्यजितसिंह दादा.. मी म्हणजे शशिकांत शिंदे.. मी म्हणजे पृथ्वीराज बाबा.. मी म्हणजे सारंग बाबा.. मी म्हणजे मी म्हणजे मकरंद आबा.. मी म्हणजे लाडके बंधू शिवेंद्रसिंहराजे बाबा.. मी जसा आहे फुटका- तुटका जस मला सहन केल.. तस मी म्हणजे तुम्ही सर्वजण.. जसा आहे.
यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादीने आतापर्यंत शेतकर्‍यांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेतले ते भाजप-शिवसेनेने सगळ धुळीला मिळवले आहे. फसव्या योजनांचा सतत गवगवा या शासनाकडून होत आहे. टीव्ही वरच्या मोदी कार्यक्रमावरती विश्वास ठेवू नका. असे अहवान त्यांनी शेवटी आपल्या भाषणात केले.
शशिकांत शिंदे म्हणाले निवडणुकीत इतिहास घडवायचा असतो तो नेत्यांच्या नावावर नाही तर कार्यकर्त्यांच्या नावावर घडवायचा असतो. पाटण तालुक्यातून विक्रमी मते छ. उदयनराजेंना पडतील.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले पाटण तालुक्यात ही शंभुराज यांच्या कडून खोट बोल पण रेटून बोल.. हा उपक्रम चालू आहे. अशा खोट्या आश्वासनाला बळी न पडता कार्यकर्त्यांनी हि लोकसभेची निवडणूक म्हणजे विधानसभेचीच निवडणूक आहे असे समजून कामाला लागा. असे अहवान शेवटी त्यांनी केले. यावेळी माहिती तंत्रज्ञान सेलचे प्रमुख सारंग बाबा पाटील यांनी बुथ कमेटेतील कार्यकर्ते- पदाधिकारी यांना मतदारापर्यंत कमी वेळात कसे पोहचायचे आणि मतदारांना पक्षाचे धोरण कसे समजावयाचे याचे मार्गदर्शन केले. या बुथ कमिटी मेळाव्याला पाटण तालुक्यातून मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कार्यकर्ते- पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ काळे यांनी सर्वांचे आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular