सातारा : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. पण अनेकजण रक्तदान करत नाहीत. त्यामुळे आज गरीब कुटुंबातील रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही. त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. सामाजिक भावना जोपासण्यासाठी वर्षातून एकदा तरी प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार पेठेतील श्रीमंत बालस्फूर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शनिवार दि. 30 रोजी रक्तदान शिबीर आयोजीत केले होते. यावेळी युवक, नागरीकांसह महिलांनी मोठ्या संख्येनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर स्थळी वेदांतिकाराजे यांनी भेट दिली.
श्रीमंत बालस्फूर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. समाजातील गरजू रुग्णांची रक्ताताची गरज पूर्ण व्हावी या उद्देशाने गेले दोन वर्षापासून या मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक भालचंद्र निकम, आशिष निकम आणि सहकार्यांनी सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. असे उपक्रम प्रत्येक मंडळांनी राबविले तर गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासणार नाही, असे वेदांतिकाराजे यांनी सांगितले.
श्रीमंत बालस्फूर्ती गणेशोत्सव मंडळ आणि अक्षय ब्लड बॅकेच्यावतीने आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिवसा निमित्त शनिवार दि. 30 रोजी सकाळी 10 ते 5 रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. दिवसभरात सुमारे 70 जणांनी रक्तदान केले. डॉ. भास्कर लोंढे, सतीश साळुंखे, राजू राठोड, अतुल साळुंखे, रुपाली मोटे यांची उपस्थिती होती.