सातारा : स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि लष्करी जवान यांच्या अनमोल त्यागातूनच देशाची जडणघडण झाली आहे. मात्र सध्याच्या सरकारने क्सहुकीची धोरणे राबवल्याने देशाची अधोगती होऊ लागली आहे. विकेंद्रित झालेल्या सत्तेचे पुन्हा केंद्रीकरण होत असल्याने हे जुलमी सरकार उलथवून टाकण्याची वेळ येऊन ठेपली आहे, मतदार हाच लोकशाहीतील खरा राजा असून जनतेने अविचाराने न वागता मतदानाचा पवित्र अधिकार वापरून मुजोर राज्यकर्त्यांना धडा शिकवावावा, असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
नांदगाव ता. कराड येथील श्रीराम मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बूथ कमिटी सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती तंत्रज्ञान सेलचे सारंग पाटील, माजी जि. प. सदस्य अॅड राजाभाऊ पाटील, ओबीसी सेलचे भानुदास माळी, कराड जनता बँकेचे राजेश पाटील वाठारकर, राष्ट्रवादी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे , नगरसेवक राजेंद्र यादव, सौरभ पाटील, डॉ. अजित देसाई, पांडुरंग पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.सध्याच्या सरकारने चुकीची धोरणे राबवल्याने जनतेसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.विकास घडविण्यासाठी आवश्यक धोरणे आखण्याऐवजी मनमानी कारभार करणार्या सरकारमुळे भारताची अवस्था सोमालियासारखीं होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीतीही यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. अविनाश मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, भानुदास माळी आदींचीही यावेळी भाषणे झाली. सारंग पाटील यांनी बूथ कमिटी सदस्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती दिली. अॅड राजाभाऊ पाटील यांनी प्रास्ताविक केले.
मुजोर राज्यकर्त्यांना धडा शिकवावा : उदयनराजे
RELATED ARTICLES