सातारा : ज्यांच्यावर विश्वास ठेवून पाच वर्षांपूर्वी भारतीय नागरिकांनी सत्ता सोपवली त्यांनी सर्वसामान्यांऐवजी बड्या उद्योजकांचीच घरे भरण्याचा उद्योग केला. आज विविध सुविधांचे ठेके त्यांनी ठराविक उद्योगपतींना दिले असुन जर त्यांच्यावर निर्बंध आणले नाहीत तर ते नद्या, डोंगर आणि निसर्गसुध्दा विकतील. त्यातून भारत हा दिवसाढवळ्या लुटमार होणारा देश होईल, अशी भिती व्यक्त करुन देशाचा सर्वसामान्य नागरीक सुखी करायचा असेल तर सत्तांतराशिवाय गत्यंतर नाही असे स्पष्ट प्रतिपाद्न खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काढलेल्या रॅलीच्या सांगतेवेळी पोवई नाक्यावर झालेल्या जाहिर सभेत ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. यावेळी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, माजी नगराध्यक्ष श्री. छ. शिवाजीराजे भोसले, नक्षत्रच्या अध्यक्षा श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार मोहनराव कदम, आमदार आनंदराव पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माथाडींचे नेते अविनाश रामिष्ट्ये, जिल्हा परिषद सदस्य रमेश आण्णासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सारंग पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, पाटण पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
आताच्या लोकसभा निवडणूकीत आपण चुकीचा निर्णय घेतला तर भारताची अवस्था रशिया, सोमालिया अशा शकले झालेल्या देशांसारखी होईल अशी भिती व्यक्त करुन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की, देशाच्या सार्वत्रिक निवडणूकीकडे आपण चळवळ म्हणून पाहिले पाहिजे. मन की बात करण्याच्या बहाण्याने जनतेला फ़सविणार्या, नोटाबंदीचा निर्णय घेऊन सर्वसामान्यांना कंगाल करणार्या आणि 15 लाख रुपये खात्यावर जमा करणेच्या वल्गना करणार्या तसेच 2 कोटी रोजगारांची भूलावणी करणार्या जातीयवादी व आपमतलबी सत्ताधार्यांना सत्तेतून हाकलून देण्याची संधी या निवडणूकीमुळे आपणास मिळाली आहे. केवळ उद्योजकांची घरे भरण्यातून देशापेक्षाही उद्योगपती मोठे झाल्याचे चित्र दिसुन येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा छाटछुट इस्ट इंडिया कंपनीचे राज्य येण्याची भिती निर्माण झाली आहे. कृषीप्रधान देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या याच 5 वर्षात झाल्या आहेत असेही ते म्हणाले.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, छत्रपतींच्या राजधानीत यापूर्वीचे सर्व रेकोर्ड मोडून देशात सर्वाधिक मतांनी महाराज निवडून येतील अशी मला खात्री आहे. गतवेळी अवघी 31 टक्के मते मिळवून सत्तेवर आलेल्या मोदींनी या पाच वर्षात देशाची अक्षरशा: धुळधाण केली आहे. पंतप्रधान पदावरिल व्यक्तीने सर्व संकेत धुळीस मिळवून व्यक्तिगत टिका करणे त्यांना शोभत नाही अशी टिकाही त्यांनी केली.
माजी उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले की, रणरणत्या उन्हातही उदयनराजेंचा अर्ज भरण्यासाठी झालेली इतकी गर्दी आताच निकाल सांगुन जात आहे. सर्वांनी जीवाचे रान करुन संपुर्ण देशात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य मिळवून उदयनराजेंना पुन्हा लोकसभेत पाठविण्याचा निर्धार करुया. सव्वाशे कोटी जनतेचे प्रमुख असणारा पंतप्रधान राष्ट्रीय प्रश्नांवर बोलण्याऐवजी सचोटीने समाजकारण व राजकारण करणार्या पवार कुटूंबियांमधे दुफ़ळी निर्माण झाल्याची खोटी वक्तव्ये करीत आहेत. ही त्यांची वैचारिक पातळी घसरल्याचे दाखवून देत आहे.
प्रास्ताविकात आ. शशिकांत शिंदे यांनी सध्या देशात मोदीची लाट ओसरली असुन महाराष्ट्रात आणि सातार्यात पवार साहेब आणि दोन्ही कॉग्रेसचीच लाट आहे असे सांगितले. अर्ज भरण्याची रॅली म्हणजे विजयाचीच रॅली असल्याचे सांगुन महाराजांचा विजय म्हणजे केवळ औपचारिकताच असल्याचे स्पष्ट केले.
रॅलीसह जाहिर सभेवेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे सरचिटणीस प्रतापराव पवार, छावा संघटनेच्या अध्यक्षा सौ. रेश्मा पाटील, मलकापूरचे मनोहर शिंदे, शशिकांत पिसाळ, शिवप्रतिष्ठानचे राहुल ननावरे, जिल्हा बॅकेचे संचालक प्रदिप विधाते, कराडचे नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, रहिमतपूरचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, लोणंदचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब बागवान, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हा परिषद सदस्य, उदय कबुले, अतुल ढमाळ, अशोकराव धायगुडे, सातारा जावली युवा कॉग्रेस समितीचे तालुका अध्यक्ष विक्रांतसिंह चव्हाण, सुहास गिरी, मिलींद पाटील, धर्मराज शिंदे, खटावचे उपसभापती संतोष साळूंखे, रमेश मोरे, वडूज चे नगराध्यक्ष डॉ महेश गुरव राजेंद्र तांबे, समीर काझी आदींसह सातारा व अन्य नगरपालिकांचे आजी – माजी नगरसेवक गावोगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटींचे पदाधिकारी व सदस्य तसेच कॉग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआई च्या कवाडे च गवई गटाचे कार्यकर्ते, तसेच सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहीरसभेनंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे श्री छ. उदयनराजे भोसले यांनी तीन उमेदवारी अर्ज सादर केले. त्यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. अजितदादा पवार, आ.श्री छ शिवेद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पोवई नाक्यावर झालेली जाहीर सभा
RELATED ARTICLES