कराड : घोटाळेबाजी आणि थापा मारण्याची परिसीमा गाठलेल्या मोदी सरकारला धडा शिकवण्यासाठी बहुजनांचे सरकार आणि सर्वसामान्यांचे राज्य देशात आणायला हवे. त्यासाठी सातार्यातून उदयनराजे भोसले यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी व काँग्रेस तसेच मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ येथील पंकज लॉन्सवर झालेल्या कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या मतदान बुथ प्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार आनंदराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष इंद्रजित मोहिते, काँग्रेसच्या सरचिटणीस रजनीताई पवार, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
अविचाराने लादलेली नोटबंदी हट्टीपणाने लागू केलेली जीएसटी करप्रणाली यामुळे हातावरचे पोट असणार्या सर्वसामान्यांचे आयुष्याला ग्रहण लागले आहे, असा आरोप करून पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, मोदी सरकारची ध्येयधोरणे म्हणजे समाजात दुफळी माजवायची आणि बहुजनांवर दबाव आणायचा असा कुटील डाव होता आणि आहे. रोजगाराचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि शिष्यवृतीची प्रकरणे असो, शेतकर्यांच्या शेतीमालाला बाजारभाव मिळण्याचे प्रश्न असोत, प्रत्येक बाबतीत हटवादी भूमिका घेण्याचे काम मोदी- शहा या जोड गोळीसह त्यांच्या सहकार्यांनी केले आहे. साम, दाम, दंड, भेद नीती वापरून सत्येच्या जोरावर दहशत माजविणार्या भाजपने अन्य पक्षातील उमेदवारांना प्रवेश देत निवडणूक लढविण्याचे काम सुरु केले आहे, मात्र त्यांचे स्वतःचे एकनिष्ठ उमेदवार किती ? हा प्रश्न निर्माण होतोच.
यावेळी खा श्री छ उदयनराजे भोसले म्हणाले, या देशात मोदींची लाट आली होती असे काही लोक म्हणतात. परंतु मला फक्त समुद्राचीच लाट माहित आहे. गेल्या पाच वर्षात केंद्रातील सरकारने लोकशाहीतील राजांना लाटले आहे. असे घोर पाप करणार्यांना सत्तेवरून खेचण्याची संधी निवडणुकीमुळे मिळाली आहे. ब्रिटिश काळातील इस्ट इंडिया कंपनीप्रमाणे यांनी बिझनेस इंडिया कंपनी आणण्याचे धोरण आखले आहे. त्यातून त्यांच्या जवळचे अगदी काही उद्योगपती गलेलठ्ठ जाहले आहेत. या सरकारने देश विकायला काढला आहे. लोकशाहीच्या नावावर सुरु असलेली ठोकशाही व हुकूमशाही उलथवून पुन्हा लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी चंग बांधा.
डॉ इंद्रजित मोहिते म्हणाले, काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत आपल्या परिसराचा अभ्यास करावा. हा अभ्यास आगामी सर्व निवडणुकीसाठी उपयोगी ठरेल. केवळ भाजपमुळेच देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. या सरकारने रिझर्व बँकेच्या कामकाजात ढवळाढवळ केली, प्रसिद्धीमाध्यमांवर बंधने लादली, युवकांच्या दिशाभुलीचा धंदा आरंभला सीबीआयच्या नेमणुकीत गडबडी केल्या. त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्यासाठी माणूस टू माणूस संपर्क करावा आपणाला माणस जोडायची आहात त्या दृष्टीने प्रचार करा.
शिवराज मोरे म्हणाले, काँगेसने गेल्या 60 वर्षात देशासाठी मोठे योगदान दिले आहे, ही बाब कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावी. देशात काँग्रेसची सत्ता येणारच आहे, मात्र त्यासाठी कार्यकर्त्यांनी मतपेटीद्वारे परिवर्तन घडवावे. शिवसेनेला सातार्यात भाजपचा उमेदवार आयात करावा लागतो. ही त्यांची घसरण आहे, अशी टीकाही त्यांनी केली .
सारंग पाटील म्हणाले कि, राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेससाठी पुन्हा आशादायी चित्र आहे. बूथ कमिटी बैठका हेच या यशाचे गमक आहे. फक्त रॅली मोठमोठ्या सभा, भपकेबाजपणा यावर कार्यकर्त्यांनी विसंबुन राहू नये. बूथ कमिटीचे काम तळागाळात जाऊन करावे लागेल. यापुढे सूक्ष्म व्यवस्थापनातून निवडणूक जिंकता येतील.
आ. आनंदराव पाटील म्हणाले की, बूथ कमिटी सक्रिय असेल तरच सहज यश मिळेल. त्यामुळे आपण दक्ष राहिले पाहिजे. गेल्या साडेचार वर्षात केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र आश्या दोन्ही थापेन्द्र भपकेबाजांमुळे देशाची प्रगती खुंटली आहे त्यामुळे आता परिवर्तन घडवा.
बंडानाना जगताप म्हणाले की, गाव तू गाव व घर टू घर जाऊन विधानसभा निवडणूक समजूनच प्रत्येकाने प्रचार करावा कराड दक्षिण मधून महाराजांना जिल्हयातील सर्वाधिक मते देऊ तालुका काँग्रेसच्या अध्यक्षा विद्याताई थोरवडे म्हणाल्या की, काँग्रेस आघाडीनेच प्रथम सर्व सामान्यांचा विचार केला प्रत्येक नागरिकाला आपण साठी काई योग्य व आयोग्य हे या निवडणुकीद्वारे समजून येईल त्यामुळे कार्यकर्तायननी जाणते पर्यंत सकारात्मक विचार धारा न्यावी.
यावेळी कराड शहर काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चना पाटील, पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील, एनएसयूआयचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवराज मोरे, शंकरराव खबाले, निवासराव थोरात, राजेंद्र चव्हाण, कराडचे नगरसेवक फारुख पटवेकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, जाकीर पठाण, मंगलाताई गलांडे, झाकीर पठाण, नाना पाटील, उत्तम पाटील, नामदेवराव पाटील, सुनील पाटील, शिवाजीराव यादव, नितीन थोरात, राजेंद्र माने, अशोकराव पाटील, संग्राम बर्गे, किसनराव पिसाळ, आनंदराव पालकर, नाना जाधव, माणिकराव पाटील तसेच कराड दक्षिण मधील प्रमुख कार्यकर्ते, बुथ कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घोटाळेबाजी आणि थापा मारणार्या मोदी सरकारला धडा शिकवा : आ. चव्हाण
RELATED ARTICLES

