वाई ः नेहमीच समस्येच्या गर्तेत असणारा वाई पालिकेचा कचरा डेपो हा पालिका प्रशासनाने धाडसी पाऊल टाकून ठेकेदा-याच्या मनमानी कारभाराला आळा घालत वाईकरांच्या जिव्हाळयाचा परंतू प्रलंबित असणारा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने कंबर कसल्याने वाईकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. वाई पालिकेचा औदयोगिक वसाहतीतील सोनापुर येथील कचरा डेपो मध्ये अनेक समस्येने ग्रासलेला होता. पालिकेने ठेकेदार नेमून शहरातून कचरा ओला-सुका कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण करणे, कचर्यापासून कंपोस्ट खत, गांडूळ खत तयार करणे असे प्रकल्प चालू करून देखील आपेक्षित उदद्ीष्ठ साध्य न झाल्याने ते नेहमी वादाच्या भोवर्यात आडकून राहीले होते. अनेक वेळा कचरा डेपोला आग लागत होती. कचरा डेपोमुळे परिसरात दुर्गंधी तसेच धुर पसरल्यामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.
या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पालिका प्रशासनाने नाशिक येथील ईबी एनव्हायरो या एजन्सीला ठेका देवून मार्च महिन्यापासून बायोमायनिंग प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. या अंतर्गत जुन्या कचर्यावर प्रक्रिया करून त्याचे संपुर्ण विलनिकरण करून अविघटनशील कचरा वेगळा केला जाणार आहे. यामधील माती, प्लास्टीक, धातुजन्य, व जैविक पदार्थ वेगळे करून पुर्नवापरासाठी पाठविले जाणार आहेत. तसेच यापासून कंपोस्ट खत निर्मिती केली जाणार असून यापासून कचरा डेपोमध्ये फुल झाडे व फळ झाडे लावली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
वाई पालिकेच्या कचर्यावर होणार बायोमायनिंग प्रक्रिया, दुर्गंधीच्या जागी दरवळणार फुलांचा सुगंध
RELATED ARTICLES