Thursday, June 26, 2025
Homeताज्या घडामोडीमाणमधील गोरे बंधुना इतर पक्षांकडून ऑफर नसल्याने त्यांचे समर्थक चिंताग्रस्त

माणमधील गोरे बंधुना इतर पक्षांकडून ऑफर नसल्याने त्यांचे समर्थक चिंताग्रस्त

सातारा ः एके काळी दुष्काळी भागातील राजकीय किंगमेकर असलेले दिवंगत सदाशिव तात्या पोळ यांची राजकीय कारकिर्दीला पुर्ण विराम देण्यासाठी त्यावेळी राष्ट्रवादीच्याच काही गद्दरांनीच हातभार लावला. त्यामुळे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आपले बंधु व उद्योजक शेखर गोरे यांच्या सहकार्याने माण-खटाव तालुक्यात बाजी मारली. पण भाऊ-बंदकीच्या वादामुळे गोरे बंधु एकमेकांना तसेच राजकीय पक्षालाही आव्हान देऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत माण मधील गोरे बंधुंना इतर पक्षांकडून ऑफर नसल्याने त्यांचे समर्थक भविष्यातील वाटचाली बद्दल चिंताग्रस्त झालेले आहेत. हे स्पष्ट दिसू लागले आहे.
2009 साली झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार दिवंगत सदाशिव तात्या पोळ यांचा पराभव करून आमदार जयकुमार गोरे यांनी विकास कामाच्या जोरावर पुन्हा एकदा आमदारकी पदरात पाडून घेतली. पहिल्या टर्मला त्यांच्या सोबत युवा नेते व त्यांचे बंधु शेखर गोरे, अरूण गोरे यांची समर्थ साथ लाभली. राम-लक्ष्मण-भरत अशी उपमा मिळालेल्या या गोरे बंधुंमध्ये आर्थिक व्यवहारातून वितुष्ट निर्माण झाले. त्यातून माण-खटाव मधील सत्ता संघर्ष अधिकच पेटला. तरी ही आ. गोरे यांनी जिल्हा बँकच्या निवडणूकीत बाजी मारून विजय हस्तगत केला. त्यामुळे त्यांची ताकद वाढल्याची दिसून आले. पण दुसर्‍या बाजुला गावागावात गटातटाच्या राजकारणामुळे अनेकांनी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचा त्याग करून इतर पक्षाचा आश्रय घेतला. यामध्ये राजकीय महत्वकांक्षा काहिंची लपून राहिली नाही. अशी चर्चा नेहमीच होत असते.
बोराट वाडी, ता. माण याठिकाणी आपल्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाच्या सातारा व सोलापूर जिल्ह्यातील मोजक्या नेत्यांची बैठक घेऊन राष्ट्रवादीला लोकसभेमध्ये खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करण्याची वात पेटवली. त्याचे फलीत म्हणून सातारा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी काँग्रेस पक्षांचा राजीनामा देवून थेट माढा लोकसभा मतदार संघाची भाजपची उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे सातारा, सांगली विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार युवा नेते व आमदार गोरे बंधु शेखर गोरे व त्यांच्या समर्थकांनी फलटण येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या संपर्क मेळाव्यात राडा करून जेष्ठ नेते शरद पवार यांना सुद्धा आत्मचिंतन करण्याची वेळ आणली. या दोन्ही घडामोडींमुळे गोरे बंधुंचे निष्ठावंत समर्थक यांना आता आपल्या भविष्याची काळजी वाटू लागली आहे. कारण भविष्यात हे गोरे बंधु कधीही एकत्र येणार नाहीत. गाव पातळीवर संघर्ष करणे हेच आपल्या वाटेला येणार आहे. तर दुसर्‍या बाजुला कोणत्याही इतर राजकीय पक्षाने ऑफर केली नसल्यामुळे काही समर्थक गड्या आपुला पहिलाच राजकीय पक्ष बरा, अशी खाजगीत चर्चा करू लागलेले आहेत.
माण-खटाव तालुक्यात भाजपच्या वाढत्या वर्चस्वाने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, रासप या पक्षातील कार्यकर्त्यांना आता भाजपशिवाय पर्याय राहिलेला नाही. परंतु त्याठिकाणी ही गटातटाचे राजकारण सुरू झालेले आहे. भाजपच्या नियोजनाच्या सभेला भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर व अनिल देसाई समर्थकांमध्ये चांगलीच कुरबूरी झालेली आहे. हे भाजपच्य वरीष्ठ नेत्यापर्यंत पोहोचवण्याचे काम प्रसार माध्यमांनी केले आहे. तीच परिस्थिती गोरे बंधुंच्या संघर्षाच्या भूमिकेने इतर पक्षाने त्यांना अद्याप ऑङ्गर दिली नसल्यामुळे गोरे बंधुंची राजकीय अवस्था हा नरड्यात अडकलेल्या हडकासार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular