ओगलेवाडी: एकीकडे वसंत ॠतु फुलला आहे. तर दुसरीकडे उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे माणसाच्या जीवाची लाही लाही होत आहे.वातावरणातील उष्मा वाढला असला तरी सकाळच्या अल्हाददायक वातावरणामुळे झाडा झुडुपांंना नवीन पालवी फुटली आहे. आंब्याला कैर्या आल्या आहेत. करवंद, जांभुळ इत्यादी फळांना बहर आला आहे. सकाळच्या प्रहरी कोकीळेचा आवाज ऐकुण मन तृप्त होत आहे. पण दुपार होताच उन्हाच्या झळा इतक्या तीव्र होत आहेत की मानवी जीवाची लाही लाही होत आहे. तापमानात मोठयाप्रमाणात वाढ झालेली आहे. 30 ते 40 अंश सें. पर्यंत तापमान जात आहे. याचा पशु पक्षांच्या जीवनावरही परिणाम झाला आहे. या प्राप्त परस्थितीमुळे लोकांचे पाऊले शीतपेयकडे वळु लागली आहेत. तसेच निवासस्थानातील पंख, एसी, कुलर इ. उपकरणे कार्यरत झाली आहेत. शहर व ग्रामीण भागात जीवाला थंडावा देणारी कलिंगड, काकडी या सारखी फळे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. ठिकठिकाणी लिंबू सरबत, कोकम, मलई, मठ्ठा, लस्सी, ताक, फळांचे ज्युस इ.शितपेय विक्रीसाठी चौकाचौकात उपलब्ध झाले आहेत. तसेच काही समाजसेवी संस्था व नागरिकांनी रस्त्यालगत ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाणपोई उभारल्या आहेत. दुपारच्यापारी रस्त्यावरील वर्दळ रोडावली आहे. नागरिक मिळेल त्या सावलीचा आडोसा घेत आहेत. वयोवृध्द, लहान बालकांच्या आरोग्यावर या वातावरणांचा परिणाम झाला आहे.
वातावरणातील तापमानात वाढ: शीतपेय बाजारात
RELATED ARTICLES