मान्यतेसाठी हात ओले झाल्याची चर्चा
मेढा : केंजळ ता.जावली येथील दगडाच्या खाणीचे गौडबंगाल झाल्याची चर्चा केंजळ पंचक्रोशी परिसरात दबक्या आवाजात येत असून कोणत्याही विभागाची परवानगी न घेता व केंजळ ग्रामपंचायतीचा ठराव व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचा ठराव न घेता मनमानी पध्दतीने डोंगरातील दगड खनिजला जाणार्या रस्त्याचे काम शेतकर्यांच्याच जमिनीतून होत असल्याने जावली तालुक्याचे नेते व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी घटनास्थळी जावून केंजळ ग्रामस्थांच्या सहकार्याने काम बंद पाडले.
केंजळ येथील खाणकाम करणेसाठी महसूल विभागाला दगडखाण करणे कामी महसुल भरण्यात आला.परंतू ज्या ठिकाणी खाणकाम करणार आहेत त्या 62/1 मधील जागेमध्ये 40 शेतकरी आहेत त्यांची हरकत घेण्यात आली नाही. तसेच जी जमीन रस्त्यासाठी घेतली जातेय त्याचा मोबदला शेतकर्यांना देण्यात आला नाही. केंजळ गावातील दगड खान बंद करावी यासाठी सर्व कायदेशीर बाबी पडताळून केंजळ ग्रामस्थ व वसंतराव मानकुमरे यांनी निर्णय घेतला असून जोपर्यंत पर्यावरण, बांधकाम,भूजल विभागाची,ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात येत नाही तोपर्यंत काम चालू करू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
सपोनि नीलकंठ राठोड यांनी सुरूवातीला ग्रामस्थांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला परंतू ग्रामस्थांच्या बाजूने मानकुमरे यांनी आपली बाजू भक्कमपणे कागद पत्राच्या पुराव्यानिशी माडूंन पोलीसांची दमबाजी थांबवत आम्हाला अटक केली तरी चालेल परंतू आता माघार घेणार नाही अशी भुमिका घेतल्याने केंजळ ग्रामस्थांच्या जमिनीवर ठेवण्यात आलेल्या क्रेशर,जेसीबी, पोकलॅन व इतर साहित्य हटविण्यात आले. एखाद्याच्या शेतात जमिनीची लेवल करण्यासाठी मुरूम बाजुला केला महसुल विभाग लाखोंचा दंड संबधित शेतकर्याला भरायला सांगतो केंजळच्या इथं कसलीही परवानगी न काढता डोंगरात चारशे मीटर रस्ता केला जातो त्यावेळी तिकडं पाहिलंही जात नाही मग नक्की प्रशासनाची या मागची भुमिका काय आहे ? अशी संशयाची सुई ग्रामस्थांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. डोंगरात रस्ता करीत असताना रस्त्यात येणारी सागवानाची झाडे वनविभागाची परवानगी न घेताच रस्त्यात गाडली गेली. यावर संबधितावर गुन्हे दाखल होणार का? असा प्रश्न शेतकर्यांनी उपस्थित केला आहे.
केंजळ मोरखिंड येथील दगडाच्या खाणीचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले
RELATED ARTICLES