लोंकांच्या समोर कधी राजे म्हणून नाही तर उदयन म्हणूनच गेलो
पाटण : घराण्याच्या नावावर कधी मताचा जोगवा मागितला नाही. लोंकांच्या समोर कधी राजे म्हणून नाही तर उदयन म्हणूनच गेलो. त्यांच्या विश्वासाला पात्र राहिलो. म्हणनूच मागील पाच वर्षांत मतदार संघात 18 हजार 125 कोठी 85 हजार रुपयेची विकास कामे मतदार संघात आणली. तर पाच वर्षातील खासदार निधीतील 25 कोठी पेक्षा जास्त 25 कोठी 27 लाख रुपयेची कामे मी मतदार संघात केली. काम करतोय म्हणूनच माझे मताधिक्य वाढतेय. केवळ यात्रे पुरते गावी येऊन लोकांशी खोटे बोल पण रेटून बोल असे उध्दोग कधी केले नाही. असा घणाघात खा. छ. उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेचे विरोधी उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यावर पाटण येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार खा. छ. उदयनराजे भोसले यांचा पाटण शहरातून रोड शो झाला. तदनंतर निवडणूक कार्यालयाचे पाटण येथे उदघाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, जि.प. सदस्य रमेश पाटील, पं.स. उपसभापती राजाभाऊ शेलार, जि.प. सदस्य बापुराव जाधव यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खा. छ. उदयनराजे भोसले म्हणाले लोकशाहीतील राजे हि जनता आहे. आणि या जनतेला कामाशी संबंध असतो. आणि जनतेची कामे मी प्रामाणिक त्यांच्या विश्वासाला पात्र राहून करतो. म्हणूनच मी अधिक मताधिक्याने निवडून येतो. मात्र काहीजण व्यक्तीदोषापोठी माझी बदनामी करतात त्यांचा मी निषेध करतो. अशा लोकांच्यावर मी अब्रुनुकसानभरपाई दावा दाखल करु शकतो पण तो मी करणार नाही. कारण हे निवडणूकीचे वारे आहे. ते तेवढ्यापुरतेच राखावे अशी अम्हाला शिकवण आहे. माझे कौलेजचे शिक्षण संपल्यापासुन मी सातार्यात राहतोय. सतत लोकांच्या संपर्कात असल्यानेच त्यांनी मला प्रथम नगरसेवक केले. त्यानंतर महाराष्ट्र शासन क्रुष्णा खोरे महामंडळाचा उपाध्यक्ष झालो. कोयना धरणाच्या बाबतीत अनेक प्रश्न विक्रमसिंह पाटणकर यांच्या सहकार्याने मार्गी लावले. त्यानंतर मी आमदार झालो. लोकांनी आशिर्वाद दिला मी खासदार झालो.
मी दहशत माजवतो असा मझ्यावर विरोधक आरोप करतात. वाईट काही मी करत नाही. पण कोणावर अन्याय अत्याचार होत असेल तर तो मी सहन करणार नाही. विरोधी उमेदवार नरेंद्र पाटील यांनी माझ्यावर नको ते आरोप केले तरी ते व्यक्तीगत चांगले आहेत. मी दुसर्या वर आरोप करणार नाही. कै. आण्णासाहेब पाटील यांचे कार्य मोठे आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने कै. आण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांचा लढा संघटित केला. त्यांना न्याय मिळवून दिला. अशा चांगल्या लोकांच्यात माथाडी कामगार म्हणून मी काम करायला तयार आहे. मला फक्त माथाडी कामगारांचा बैच द्या. असे उदयनराजे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत सांगितले.
घराण्याच्या नावावर कधी मतांचा जोगवा मागितला नाही
RELATED ARTICLES