ओगलेवाडी: छत्रपती शिवाजी महाराज यंाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सदाशिवगड येथील शिवकालीन चिंच विहिरीतील गाळ काढण्याच्या कामास शनिवारी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रारंभ करण्यात आला. सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे कार्य आदर्शवत आहे. महत्त्वकांक्षी राज्यातील पहिली पाणी योजना तसेच अन्य उपक्रम दिशादर्शक असल्याचे गौंदवोद्गार मान्यवरांनी यावेळी काढले.
हजारमाची ता. कराड येथील किल्ले सदाशिवगड याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात अनन्यसाधारण असे महत्त्व होते. त्यामुळेच या ऐतिहासिक किल्याचे संवर्धन करण्यासाठी सदाशिगड मावळा प्रतिष्ठान गेल्या 12 वर्षापासुन प्रयत्नशील आहे.
गड संवर्धनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणुन चिंच विहिरीतील गाळ काढण्याच्या कामाकडे पाहिजे जात आहे. शनिवारी सकाळी पुजारी आनंदराव गुरव आणि गडप्रेमी किरण काशिद यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी डॉ. अमित देशमुख, अॅड. वसंतराव मोहिते, गौतम निलाखे, नितीन तांबवेकर यंाच्यासह मान्यवरांनी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार, राहुल जाधव, पकंज पांढरपट्टे, अभिजीत क्षीरसागर, संदीप मुळीक, चंद्रजित पाटील, सुमित पळसे, प्रशांत इनामदार यंाच्यासह गडप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
शिवकालीन चिंच विहिरीची होणार डागडुजी
RELATED ARTICLES