Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीदेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेस विचारधारेचे मोलाचे योगदान : आ. बाळासाहेब पाटील

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेस विचारधारेचे मोलाचे योगदान : आ. बाळासाहेब पाटील

कराड : व्यापारी म्हणून भारतात पाऊल टाकलेल्या ब्रिटिश राजवटीच्या जोखडातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विचारधारेचे मोलाचे सहकार्य लाभले असून, या स्वातंत्र्यसंग्रामात देशातील अनेक सुपुत्रांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये वीज, पाणी, रस्ते यासारख्या सुविधा निर्माण झाल्या. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांसारखे नेते देशाला लाभले. त्यांनी जलसिंचनाचे महत्वकांक्षी प्रकल्प उभारले, त्यातून महाराष्ट्रातील नव्या आर्थिक पर्वाला सुरुवात झाली, स्वातंत्र्य चळवळीमध्ये काडीमात्र संबंध नसलेल्या लोकांडून काँग्रेसने काय विकास केला ? असा सवाल उपस्थित करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सद्या सुरू आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस विचारधारेचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
ते राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ वडगाव (जयराम स्वामी), ता.खटाव व परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्या प्रसंगी बोलत होते. मेळाव्यास सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य मानसिंगराव जगदाळे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक लहुराज जाधव, खटाव मार्केट कमिटीचे माजी उपसभापती जोतिराम थोरात, श्रीकांत पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी जोतिराम थोरात, श्रीकांत पिसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की,भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर च्या काळामध्ये शास्वत विकास व विचार रुजविण्याचे काम काँग्रेसच्या विचारसरणीने केले. स्वतंत्र संग्रामाच्या लढाईमध्ये या जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे असे यावेळी ते बोलत होते. भाजप सरकारच्या काळात शेती व शेतकर्‍यांच्या हिताचे कोणतेही निर्णय झाले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगांवी बुथ कमिट्यांची स्थापना करण्याची संकल्पना पुढे आली. त्या माध्यमातून कराड उत्तर मध्ये विक्रमी बुथ कमिटया स्थापन झाल्या. या बूथ कमिटी सदस्यांच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन करून जास्तीत जास्तमतदारांपर्यंत पोहचणे व हे सर्व मतदान आघाडीच्या उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मिळण्यासाठी बूथ कमिटी अध्यक्ष व सदस्यांनी प्रयत्नशील राहणे आवश्यम असल्याचे यावेळी आमदार
बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. मानसिंगराव जगदाळे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये काँग्रेस सरकारने उद्योगधंद्यांमध्ये वाढ केली. स्वातंत्र्यानंतर देशाचा सर्वांगिण विकास करण्याची जबाबदारी काँग्रस विचारधारेने आपल्या खांद्यावर घेतली व देशाचा शोशत विकास केला. देशाच्या स्वातंत्र्य लढयामध्ये कोणत्याही प्रकारचे योगदान नसलेल्या लोकांना देशाचा 60 वर्षात काय विकास झाला असे भावनिक प्रश्‍न विचारून जनतेची दिशाभूल सुरू आहे. त्यामुळे या पुढील काळात विरोधकांच्या आमिषाला अथवा अफवांना बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून, सातारा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी मानसिंगराव जगदाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लक्ष्मण घार्गे यांनी केले व आभार वसंतराव घार्गे यांनी मानले. मेळाव्यास जोतीराम थोरात, संतोष घार्गे, शिवाजी अवघडे, बापूराव पिसाळ, बजरंग पिसाळ, लक्ष्मण घार्गे, दूटाळ(सर), नंदकुमार देशमुख, श्रीकांत पिसाळ, राजीव पिसाळ, बापुराव पिसाळ, सुदाम पिसाळ, संजय चव्हाण, विजय पिसाळ, बजरंग पिसाळ, विष्णूपंत पिसाळ, नारायण घार्गे, आनंदा घार्गे, रामचंद्र थोरात दिनकर पाठक, निवास शिंदे, माधव घाडगे, बाळासो वाघमोडे, असलम मुलानी, विठ्ठल जाधव, किसन नागमळ, अविनाश घार्गे, नाथा भोसले, आनंदराव यादव, रवींद्र घार्गे व मारुती पवार यांचेसह वडगाव ज.स्वा. व पंचक्रोशीतील विविध गावचे ग्रामस्थ व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular