कोयनानगर : पुनर्वसनाचे प्रश्न धरणग्रस्तांना विचारात घेऊनच सोडवले जातील. केटीवेअर बांधून महिंद धरणातून पाणी देण्यात येईल. असंख्य लोकांच्या अपेक्षांच्या नजरा माझ्याकडे लागल्या आहेत. त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असा शब्द खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी येथे बोलताना दिला.
काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या शुक्रवारी पाटण तालुक्यातील कोयनानगर, ढेबेवाडी व मोरगिरी पेठ शिवापूर येथे प्रचारसभा झाल्या. त्यात ते बोलत होते.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, काँग्रेसचे हिंदूराव पाटील, उपसभापती राजाभाऊ शेलार, पं. स. सभापती उज्वलाताई जाधव, बापूराव जाधव, राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष नरेश देसाई, रघुनाथ नलवडे, पं. स. सदस्य बबन कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
कोयना भागात निसर्गसंपन्नता आहे. वॉटर स्पोर्टस, ट्रेकिंग, निवास- न्याहरी योजना आदींच्या माध्यमातून रोजगाराला चालना मिळेल. कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून या भागाच्या विकासासाठी मोठा निधी मिळू शकतो. हे करताना लोकांची साथ महत्वाची आहे, असे सांगून उदयनराजे म्हणाले, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न जवळपास मार्गी लागला आहे. ज्यांची जमीन जाणार आहे. अशा शेतक-यांना एकरी 17 लाख रुपये देण्यात येणार आहेत. ढेबेवाडी भागातील 3 गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांना विचारात घेऊनच सोडवण्यात येईल. महिंद धरणातून केटीवेअर बांधून पाणी देण्यात येईल.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, व्याघ्र प्रकल्पातून 14 गावे बाहेर काढण्यासाठी या सरकारला 5 वर्षे पुरली नाहीत. गावे वगळण्याचा जीआर यांना काढता आला नाही. बोटिंगच्या माध्यमातून कोयनेत पर्यटनास चालना मिळाली. रहदारी वाढली. या चांगल्या गोष्टींना विरोध करण्याचे सरकारचे धोरण आहे. यांनी बोटिंग बंद करून टाकले. रोजगार वाढीसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत.
ओबीसी, धनगर, मराठा अशा समाजबांधवांना आरक्षणाचं गाजर दाखवण्याचं काम सरकारने केले. लोकांची फसवणूक करणा-या सरकारला त्यांची जागा दाखवण्याचे काम राष्ट्रवादीला मतदान करून करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
उदयनराजे हे सर्वसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व आहे. शिवरायांचे हे वंशज आपल्या कर्तव्यात कमी कमी पडणार नाहीत; आपणही त्यांना विक्रमी मताधिक्य देऊन कर्तव्यात कमी पडू नये, असे आवाहन हिंदूराव पाटील यांनी केले.यावेळी राजाभाऊ शेलार, नरेश देसाई, चंद्रकांत जाधव आदींची भाषणे झाली.
यावेळी प्रतापभाऊ देसाई, जि. प.सदस्य बापूराव माने, उत्तमराव माने, अॅड. अविनाश जानुगडे, सुनंदा पुजारी, सुनंदा पाटील, आनंदराव साळुंखे, जे.पी. पाटील, विठ्ठलराव पाचुपते, नथुराम मोरे, नाना मोरे, अॅड. ए. पी. पाटील, नरेंद्र पाटणकर, पांडूरंग यादव, प्रल्हाद मोरे, नानासाहेब गुरव, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा स्नेहलता जाधव, पुजाताई कदम, श्रीनिवास पाटील, विष्णू सपकाळ, संतोष कदम, सरफराज जमाते, बापू देवळेकर, लहू कदम, भरत कदम, रमेश कदम, मनोज मोहिते, आनंदा कदम, दिपक कदम, अर्जुन कदम, भिमराव शिंदे, बाळासाहेब कदम, श्रीपत माने, शिवाजी सूर्यवंशी, रमेश जाधव, विठ्ठल बाबर, अरूण शेलार, सत्यजीत शेलार, दिपक चाळके, आनंदा इंगळे, शौकत पटेल, आनंदा इंगळे, सचिन कुंभार, अशोक मोरे, मोरणा सहकारी पतसंस्थेचे संजय हिरवे, पाटण अर्बन बँकेच्या संचालिका कविताताई हिरवे, जयवंत सुर्वे, संदीप कोळेकर, सुनील मोरे, राजाराम मोरे तसेच भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.
धरणग्रस्तांना विचारात घेऊनच पुनर्वसनाचे प्रश्न सोडवू
RELATED ARTICLES