Monday, June 23, 2025
Homeताज्या घडामोडीलोकसभेचा फैसला मतदारराजा करणार

लोकसभेचा फैसला मतदारराजा करणार

साताराः लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी ( दि. 23 ) सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवडणुकीत 18 लाख 38 हजार 987 मतदार 9 जणांचे भविष्य ठरविणार आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या लोकसभेचा फैसला मतदारराजा करणार आहे.
दरम्यान, आज सोमवारी सकाळी विविध मतदान केंद्रावर जाण्यासाठी शाहू क्रिडा संकुल येथे मतदान कक्ष अधिकारी कर्मचार्‍यांची हजारोंच्या संख्येेने गर्दी झाली होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तसेच विविध शाळांच्या खाजगी बसेसमधून जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर हे अधिकारी व कर्मचारी मतदान यंत्रे घेवून रवाना झाले.
पुरुष मतदार 9 लाख 35 हजार 878 इतके आहेत. तर महिला मतदार 9 लाख 3 हजार 92 इतक्या आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या 17 इतकी आहे. सोमवारी तालुक्यांच्या मुख्यालयातून निवडणूक कर्मचारी 2296 मतदान केंद्रांवर रवाना झाले. मतदान प्रक्रियेसाठी 2 हजार 873 कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
दिव्यांग मतदार केंद्रामध्ये दिव्यांगांसाठी व्हिलचेअर, घरातून मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील डमी पत्रिका, तसेच भिंग ठेवण्यात आले आहे. सातारा लोकसभा मतदार संघामध्ये आचारसंहिता भंगाचे 45 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व सौम्य स्वरुपाचे गुन्हे असून, एकही गंभीर गुन्हा दाखल झाला नाही.
उमेदवारांकडून कारवाई करण्यासारखा गंभीर एकही कृत्य केले नाही. जिल्ह्यातील एकूण 301 मतदान केंद्र्रांवर लाईव्ह वेबकास्टिंगच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे. यावर जिल्हास्तरावरून नियंत्रण करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून निरीक्षण ठेवण्यात येणार आहे.निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. यासाठी जमावबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून, पाचपेक्षा जास्त लोक जमण्यास सक्त मनाई आहे.
तसेच मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदानाच्या 48 तास अगोदर इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मीडियावर प्रचार करण्यास बंदी आहे.
दरम्यान, गेल्या महिनाभरापासून लोकसभा निवडणुकीचे वातावरण भलतेच तापले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सातार्‍यांत खासदार शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या दिग्गजांच्या सभा झाल्या. गेल्या महिनाभरापासून राजकीय नेत्यांचे समुद्रमंथन सुरु होते. मंगळवारी मतदार आपला कौल देणार आहेत. 23 मे रोजी हा कौल उघडकीस येणार आहे.
मतदानासाठी वाई विभाग सज्ज
वाई खंडाळा महाबळेश्वर या तीन तालुक्यांचा सामावेश असलेल्या या मतदार संघात 1 लाख 66 हजार 758 पुरुष व 1 लाख 63 हजार 361 महिला आशा 3 लाख 30 हजार 119 एकूण मतदारांचा सामावेश आहे. यामध्ये 2218 दिव्यांग मतदार असून त्यापैकी 1483 अस्तिव्यंग मतदार आहेत. वाईत 191, महाबळेश्वर 128, खंडाळा 131 असे 450 मतदार केंद्र आहेत. त्यापैकी वाई तालुक्यात जांब व कोंढवली बु. तसेच खंडाळा तालुक्यात खंडाळा अशी 3 संवेदनशील केंद्र व महाबळेश्वर तालुक्यात 40 केंद्र दुर्गम भागात आहेत. प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी, व एक सेवक अशा एकूण 2475 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये 850 महिला कर्मचार्‍यांचा सामावेश आहे. तसेच 495 पोलिस कर्मचार्‍याचा बंदोबस्त लावन्यात आला आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी तिन्ही तालुक्यातील तहसीलदार, पाच नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली 88 झोनल अधिकारी, 3 गटविकास अधिकारी कार्यरत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर शिस्त राखण्यासाठी आलेल्या मतदारांना रांगेत उभे करणे, यासाठी दोन युवक व एक युवती अशा तीन महाविद्यालयीन स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदार केंद्रावर पाळणाघर सेविका / मदतनीस तसेच प्रथमोपचार केंद्रासाठी आशा सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी खास व्यवस्था केली असून त्यासाठी 88 वाहनांची सोय केली आहे. दृष्टीहीन मतदारांसाठी ब्रेल लिपीतील डमी मतपत्रिका, अल्पदृष्टी मतदारांसाठी भिंगाची व्यवस्था केली आहे. मतदान अधिकारी व कर्मचार्‍यांना मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी 62 एस टी बसेस व 5 मिनीबस, 117 खाजगी वाहने तसेच कंदाटी खोर्‍यातील दुर्गम भागातील मतदान केंद्रावर पोहचण्यासाठी तीन बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदी आदेशलागू केला आहे. आणि मतदारांकडे मतदान ओळखपत्र नसेल तर आधार कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, पोस्टाचे किंवा बँकेचे छायाचित्र असेलेला पुरावा ग्राह्य धरला जाईल.
मतदानासाठी 150 वाहने मुंबईला रवाना
गेली महिनाभर सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या काळात देशभर प्रचाराची राळ उठली होती. सातारा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मेळावे घेण्यात आले होते. आता मतदारांना गावी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता यावे यासाठी सुमारे दिडशे वाहनांचा ताफा राजकीय पक्षांच्या प्रचारकांनी सज्ज ठेवला आहे. आज सकाळी मतदान झाल्यानंतर पुन्हा मतदारांना सोडण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील मोठ्या संख्येने माथाडी कामगार हे नवी मुंबई, वाशी, कळंबोली, खारघर, ऐरोली, सानपाडा, बेलापूर, पनवेल, ठाणे, भांडुप, घाटकोपर, विक्रोळी, भायखळा, परेल, कुर्ला आदी परिसरात राहत आहेत. अनेकांनी जाणीवपूर्वक आपआपल्या मूळ गावच्या पत्त्यावर मतदान प्रक्रियेत भाग घेतला आहे. ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावत असतात. यंदा सातारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व शिवसेनेने नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही मत्ताबर उमेदवारांनी प्रचारानिमित्त नवी मुंबई, ठाणे येथे मेळावे घेतले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. सध्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक मत महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे आपल्या बाजूने हक्काचे मतदान व्हावे यासाठी लक्झरी वाहने, बस व इतर सुमारे दिडशे वाहनांचा ताफा आहे. काहींनी आपल्या जवळच्या उमेदवारासाठी स्वखर्चाने वाहने पुरविण्याची व्यवस्था केली आहे.तसेच दुपारी व रात्रींच्या जेवणाची ही व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या उन्हाळी शाळेला सुट्टी, लग्नसराई, यात्रा-जत्रा व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी गावी जाण्याची संधी उपलब्ध झाली असल्याने मतदार खुष झाले आहेत. सकाळी मतदान केल्यानंतर रात्री किंवा पहाटे पुन्हा इच्छुक स्थळी सुखरूप घरी सोडविण्यात येणार आहे.
दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्यानंतर फारशा तक्रारी करण्यात राजकीय पक्ष व मान्यवर उमेदवारांनी स्वरस्था दाखविली नाही. तेरी भी चुप और मेरी भी चुप,, मतदान करेंगे,, हम तुम दोनो गुपचूप,, असे या वाहन पुरणाचे वर्णन केले जात आहे. तर आम्ही मतदानासाठी कोणालाही वाहन पुरविले नाही असा खुलासा मान्यवरांनी केला आहे. माथाडी कामगार हे स्वाभिमानी आहेत. ते स्वखर्चाने गावी मतदान करण्यासाठी जात आहेत अशी माहिती सायगाव येथील खारघरचे रहिवाशी सचिन जगताप, जावळीचे उपसभापती दत्ता गावडे, श्रीहरी गोळे व अनेकांनी दिली आहे.यामुळे किमान दहा हजार मतदार मतदानाची टक्केवारी वाढवतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
लोकसभेचा फैसला मतदारराजा करणार
साताराः लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी ( दि. 23 ) सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवडणुकीत 18 लाख 38 हजार 987 मतदार 9 जणांचे भविष्य ठरविणार आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या लोकसभेचा फैसला मतदारराजा करणार आहे.
दरम्यान, आज सोमवारी सकाळी विविध मतदान केंद्रावर जाण्यासाठी शाहू क्रिडा संकुल येथे मतदान कक्ष अधिकारी कर्मचार्‍यांची हजारोंच्या संख्येेने गर्दी झाली होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तसेच विविध शाळांच्या खाजगी बसेसमधून जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर हे अधिकारी व कर्मचारी मतदान यंत्रे घेवून रवाना झाले.
पुरुष मतदार 9 लाख 35 हजार 878 इतके आहेत. तर महिला मतदार 9 लाख 3 हजार 92 इतक्या आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या 17 इतकी आहे. सोमवारी तालुक्यांच्या मुख्यालयातून निवडणूक कर्मचारी 2296 मतदान केंद्रांवर रवाना झाले. मतदान प्रक्रियेसाठी 2 हजार 873 कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
दिव्यांग मतदार केंद्रामध्ये दिव्यांगांसाठी व्हिलचेअर, घरातून मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील डमी पत्रिका, तसेच भिंग ठेवण्यात आले आहे. सातारा लोकसभा मतदार संघामध्ये आचारसंहिता भंगाचे 45 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व सौम्य स्वरुपाचे गुन्हे असून, एकही गंभीर गुन्हा दाखल झाला नाही.
उमेदवारांकडून कारवाई करण्यासारखा गंभीर एकही कृत्य केले नाही. जिल्ह्यातील एकूण 301 मतदान केंद्र्रांवर लाईव्ह वेबकास्टिंगच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे. यावर जिल्हास्तरावरून नियंत्रण करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून निरीक्षण ठेवण्यात येणार आहे.निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. यासाठी जमावबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून, पाचपेक्षा जास्त लोक जमण्यास सक्त मनाई आहे.
तसेच मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदानाच्या 48 तास अगोदर इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मीडियावर प्रचार करण्यास बंदी आहे.
दरम्यान, गेल्या महिनाभरापासून लोकसभा निवडणुकीचे वातावरण भलतेच तापले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सातार्‍यांत खासदार शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या दिग्गजांच्या सभा झाल्या. गेल्या महिनाभरापासून राजकीय नेत्यांचे समुद्रमंथन सुरु होते. मंगळवारी मतदार आपला कौल देणार आहेत. 23 मे रोजी हा कौल उघडकीस येणार आहे.
मतदानासाठी वाई विभाग सज्ज
वाई खंडाळा महाबळेश्वर या तीन तालुक्यांचा सामावेश असलेल्या या मतदार संघात 1 लाख 66 हजार 758 पुरुष व 1 लाख 63 हजार 361 महिला आशा 3 लाख 30 हजार 119 एकूण मतदारांचा सामावेश आहे. यामध्ये 2218 दिव्यांग मतदार असून त्यापैकी 1483 अस्तिव्यंग मतदार आहेत. वाईत 191, महाबळेश्वर 128, खंडाळा 131 असे 450 मतदार केंद्र आहेत. त्यापैकी वाई तालुक्यात जांब व कोंढवली बु. तसेच खंडाळा तालुक्यात खंडाळा अशी 3 संवेदनशील केंद्र व महाबळेश्वर तालुक्यात 40 केंद्र दुर्गम भागात आहेत. प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी, व एक सेवक अशा एकूण 2475 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये 850 महिला कर्मचार्‍यांचा सामावेश आहे. तसेच 495 पोलिस कर्मचार्‍याचा बंदोबस्त लावन्यात आला आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी तिन्ही तालुक्यातील तहसीलदार, पाच नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली 88 झोनल अधिकारी, 3 गटविकास अधिकारी कार्यरत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर शिस्त राखण्यासाठी आलेल्या मतदारांना रांगेत उभे करणे, यासाठी दोन युवक व एक युवती अशा तीन महाविद्यालयीन स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदार केंद्रावर पाळणाघर सेविका / मदतनीस तसेच प्रथमोपचार केंद्रासाठी आशा सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी खास व्यवस्था केली असून त्यासाठी 88 वाहनांची सोय केली आहे. दृष्टीहीन मतदारांसाठी ब्रेल लिपीतील डमी मतपत्रिका, अल्पदृष्टी मतदारांसाठी भिंगाची व्यवस्था केली आहे. मतदान अधिकारी व कर्मचार्‍यांना मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी 62 एस टी बसेस व 5 मिनीबस, 117 खाजगी वाहने तसेच कंदाटी खोर्‍यातील दुर्गम भागातील मतदान केंद्रावर पोहचण्यासाठी तीन बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदी आदेशलागू केला आहे. आणि मतदारांकडे मतदान ओळखपत्र नसेल तर आधार कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, पोस्टाचे किंवा बँकेचे छायाचित्र असेलेला पुरावा ग्राह्य धरला जाईल.
मतदानासाठी 150 वाहने मुंबईला रवाना
गेली महिनाभर सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या काळात देशभर प्रचाराची राळ उठली होती. सातारा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मेळावे घेण्यात आले होते. आता मतदारांना गावी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता यावे यासाठी सुमारे दिडशे वाहनांचा ताफा राजकीय पक्षांच्या प्रचारकांनी सज्ज ठेवला आहे. आज सकाळी मतदान झाल्यानंतर पुन्हा मतदारांना सोडण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील मोठ्या संख्येने माथाडी कामगार हे नवी मुंबई, वाशी, कळंबोली, खारघर, ऐरोली, सानपाडा, बेलापूर, पनवेल, ठाणे, भांडुप, घाटकोपर, विक्रोळी, भायखळा, परेल, कुर्ला आदी परिसरात राहत आहेत. अनेकांनी जाणीवपूर्वक आपआपल्या मूळ गावच्या पत्त्यावर मतदान प्रक्रियेत भाग घेतला आहे. ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावत असतात. यंदा सातारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व शिवसेनेने नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही मत्ताबर उमेदवारांनी प्रचारानिमित्त नवी मुंबई, ठाणे येथे मेळावे घेतले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. सध्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक मत महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे आपल्या बाजूने हक्काचे मतदान व्हावे यासाठी लक्झरी वाहने, बस व इतर सुमारे दिडशे वाहनांचा ताफा आहे. काहींनी आपल्या जवळच्या उमेदवारासाठी स्वखर्चाने वाहने पुरविण्याची व्यवस्था केली आहे.तसेच दुपारी व रात्रींच्या जेवणाची ही व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या उन्हाळी शाळेला सुट्टी, लग्नसराई, यात्रा-जत्रा व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी गावी जाण्याची संधी उपलब्ध झाली असल्याने मतदार खुष झाले आहेत. सकाळी मतदान केल्यानंतर रात्री किंवा पहाटे पुन्हा इच्छुक स्थळी सुखरूप घरी सोडविण्यात येणार आहे.
दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्यानंतर फारशा तक्रारी करण्यात राजकीय पक्ष व मान्यवर उमेदवारांनी स्वरस्था दाखविली नाही. तेरी भी चुप और मेरी भी चुप,, मतदान करेंगे,, हम तुम दोनो गुपचूप,, असे या वाहन पुरणाचे वर्णन केले जात आहे. तर आम्ही मतदानासाठी कोणालाही वाहन पुरविले नाही असा खुलासा मान्यवरांनी केला आहे. माथाडी कामगार हे स्वाभिमानी आहेत. ते स्वखर्चाने गावी मतदान करण्यासाठी जात आहेत अशी माहिती सायगाव येथील खारघरचे रहिवाशी सचिन जगताप, जावळीचे उपसभापती दत्ता गावडे, श्रीहरी गोळे व अनेकांनी दिली आहे.यामुळे किमान दहा हजार मतदार मतदानाची टक्केवारी वाढवतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular