वाई : वाई तालुक्यात उशिरा पावसाने जरी सुरुवात केली असली तरीही या तालुक्यातील शेतकर्यांनी थोडी जोखीम घेतल्याने व धूळफेक पेरणी केल्याने आज पिकांची उगवण चांगली झाली आहे. सध्या खरीप हंगाम चांगलाच जोमात आहे. शेतीची अंतर्गत मशागत चालू आहे.
तालुक्यातील सर्व प्रकारचा शेतकरी शेतातील कामात व्यस्त आहे. सोयाबीन, हिरवा मुग,चवळी. भुईमुग. बाजरी, हळद, ऊस या सर्व पिकांची परिस्थिती अतिशय चांगली आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.तर दुसर्या बाजूला पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंतेत आहे.निसर्गाने साथ न दिल्यास व थोड्यादिवासात पाऊस पडला नाहीतर खरीप हंगाम वाया जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या अंतर्गत मशागत चालू आहे.त्यामुळे जमिनीची हालचाल होवून जमिनीची धूप होते त्यामुळे पावसाची गरज असणार आहे.पाऊस वेळेत न पडल्यास हाताशी आलेले पिक वाया जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्याचा उत्पन्नावर मोठा विपरीत परिणाम होवू शकतो. सध्या जरी पावसाने साथ दिली असली तरीही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत हा तालुका आजही आहे.तालुक्यातील धरणांची पातळी आजही खालावलेली आहे.पावसाचे काही महिने बाकी असले तरीही तालुक्यातील धरणे पूर्ण क्षमतेने न भरल्यास भयानक दुष्काळाची परिस्थिती निर्माण होवू शकते. तसेच कृषी विभागानेही पुढचे पावूल टाकत पिकांचा विमा उतरविण्याचा आग्रही शेतकर्यांकडे केला आहे.त्यावरही बळीराजाने सकारात्मक विचार करावा असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.आज मितीला शेतीच्या अंतर्गत मशागतीत शेतकरी मग्न असून पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
पंतप्रधान पिक विमा योजना सुरु
सन 2016 खरीप हंगामासाठी पंतप्रधान पिक विमा योजना लागू झाली असून या योजने अंतर्गत कर्जदार शेतकर्यांना हा विमा उतरवणे बंधनकारक आहे.बिगर कर्जदार शेतकर्यांसाठी ऐच्छीक आहे.शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेवून आपल्या पिकाचा विमा उतरविण्यात यावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
-राजेंद्र कांबळे,(वाई तालुका कृषी अधिकारी,)
वाई तालुक्यात शेतीची अंतर्गत मशागतीची कामे सुरु
RELATED ARTICLES