म्हसवड (विजय भागवत)ः सातारा जिल्ह्यात माणचा दुष्काळी तालुका म्हणून प्रथम क्रमांकाचा मान कायम असून स्वातंत्र्यानंतर 72वर्षात या तालुक्याला लागलेला दुष्काळी कलंक पुसण्यात आज अखेर अपयशच आले असून तालुक्यातील 105गावात अन्न-पाणी-रोजगार-मुक्या जनावरांना चारा या समस्यांनी माणवासिय जनतेवर आणीबाणी-पाणीपाणी करण्याची वेळ आल्याने माणदेशी जनता हवालदिल झाली आहे.
माण तालुक्यात 105महसुली गावे असून सुमारे तीन जनता दुष्काळाशी संघर्ष करत आहे.दुष्काळ हा माण तालुक्याला लागलेला कलंक आहे. हा कलंक स्वातंत्र्याच्या 72वर्षात पुसून टाकण्यात आजअखेर राज्यकर्त्यांना यश आलेले नाही. निवडणूका आल्या की मतदार हा राजा होतो.अन निवडणूकीचा धुरळा खाली बसल्यावर मतदार हा राजा ऐवजी आम आदमी दुष्काळ्या बनून जातो.पुढील निवडणुका येई पर्यंत तात्पुरती मलमपट्टी केली जाते.आज तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून पिण्याच्या पाण्याची अवस्था दयनीय झाली आहे. तालुक्यात 67गावे व 528वाड्यांतील सुमारे 1लाख 26हजार754 बाधित लोकांना 95टॅकर द्वारे लाखो लिटर पाणीपुरवठा करण्यात येत असून या 25विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.
तालुक्यातील दहिवडी, पांढरी,बिजवडी हिरालाल तोंडले वडगाव येळेवाडी जाधववाडी मोगराळे पाचवड महिमानगड स्वरूपखानवाडी उकिरर्डे कोळेवाडी दिवडी शिंगणापूर राजवडी हस्तनपुर अनभुलेवाडी वावरहिरे गोंदवले बु.पिंपरी पळशी पिंगळी बु.जाशी शिरताव हिंगणी धुळदेव गंगोती वाकी मार्डी भालवडी खडकी भाटकी रांजणी वर म्हसवड कारखेल संभूखेड इंजबाव हवलदारवाडी पर्यंती वर मलवडी बनगरवाडी महाबळेश्ववाडी शेनवडी विरळी पानवन जांभुळणी कुरणेवाडी वळई चिलारवाडी पुळकोटी मलवडी वारूगड शिरवली कुळकजाई परकंदी टाकेवाडी बोडके आंधळी पांढरवाडी शिंदी बु.कासारवाडी कुकुडवाड पुकळेवाडी ढाकणी ही गावे टॅकरच्या पाण्यावर तहान भागवण्यासाठी रात्री अपरात्री टॅकरच्या पाण्यावर तुटून पडत आहेत.तर उर्वरित गावं टॅकरची प्रतिक्षा करत आहेत. अनेक गावांना आठ आठ दहा दहा दिवसांनी टॅकर येत असल्याने लोकांना पाणी पाणी करण्याची वेळ येत आहे.
तालुक्यात सलग दोन वर्ष पाऊस पुरेशा प्रमाणात न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रानं ओसाड पडली आहेत. शेतकरी वर्गाची परिस्थिती खालवली असल्याने शेतमजूर हतबल झाला आहे. हाताला काम मिळत नाही. या मुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
दुष्काळाने माण तालुक्यात बागांचे खराटे झाले असून दुष्काळ हा माण तालुक्याच्या पाचवीला पुजला आहे यावर मात करीत माळरानात डाळिंबाच्या बागा फुलवल्या, मात्र सातत्याने दुष्काळी सावट त्यात तेल्या रोगाचा पादूर्भाव असल्याने डाळिंबाच्या बागा मोडीत निघूलागल्या आहेत.अनेक शेतकर्यांनी डाळिंबाच्या बागा उपटुन टाकल्या आहेत. माणतालुक्यातील डाळिंब उत्पादन म्हणजे तांबड सोन समजलं जायच. माणच्या दुष्काळीमाळरानावर अनेक शेतकर्यांनी दीड हजार हेक्टरच्या आसपास फळबागांची लागवड केली होती. मात्र आता हे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. बागांचे सध्या खराटे झाल्याचे पाहायला मिळत आहेत, अशा बागा शेवटच्या घटका मोजत आहेत.
कुसळाच्या रानात कमी पाण्यावर निचर्याच्यामुरमाड जमिनीत डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली, पाणीवाचवण्यासाठी ठिबक सिंचन प्रणाली सर्रास वापर करण्यात आला. त्याचबरोबर ठिबक सिंचन यंत्रणेमधुन खत,औषध सोडण्यास मदत व्हायची. परिणामी मनुष्यबळ कमी लागतंअसे. बहुतांशी शेतकर्यांनी भगव्या वाणाची लागवड केलेली निदर्शनास येत आहे. सुरवातीच्या काळात शेतकर्यांनी डाळिंबाच्या बागामधून हेक्टरी लाखो रुपयांचे विक्रमी उत्पादन घेलले.माण तालुक्यातून निर्यातक्षम दर्जाचेडाळिंब पिकत असे. मात्र सातत्याने दुष्काळाच्या झळा निर्माण होत असतानापाण्याच्या तुटवड्याने डाळिंब बागायत शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.अनेकशेतकर्यांच्या बागा पाण्याअभावी जळून गेल्या आहेत तर काही शेतकर्यांच्या जमिनीत झाडाचे खराटे बनून उभे आहेत. लाखो रुपये खर्ची टाकून उभ्या केलेल्या आहेत.अशा जळालेल्या बागा पाहाताणा शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी उभं राहतं. दुष्काळी आसमानी संकटातून काही शेतकर्यांनी पाण्याची उपलब्धता करून तळहाताच्या फोड़ासारख्या जपल्या असताना निसर्गाने त्यांची पाठ सोडली नाही. या बागावर तेल्या व मर रोगाची लागण झाली आहे. याला कंटाळून डाळिंबबागायतदार शेतकर्यांनी जेसीबी लावून बागाच उपटुन टाकल्या आहेत. या बागांवर लाखो रुपये खर्च केलेले पाण्यात गेले आहेत.
तालुक्यावर दुष्काळी संकट आल्याने जनता हवालदिल झाली असून अन्न अन्न व पाणी पाणी करण्याची वेळ आली असून या आणीबाणी तून माणदेशी कशी सावरणार यामुळे जनता चिंतेत आहे.