कराड : स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात अव्वल क्रमांक पटकावणार्या नगरपरिषदेचे शहरातील वाढत्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यासह पदपथावर वाढणार्या अतिक्रमणाकडे पालिकेच्या लेाकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्यांनी गांधारीची भूमिका घेतली आहे.त्यामुळे नागरिक व वाहनचालकांना ये – जा करताना कसरत करावी लागत आहे.
पालिका प्रशासनाने अनेक दिवसांपासून स्वच्छतेच्या कामाकडे लक्ष दिले. त्यामुळे शहरात स्वच्छता दिसू लागली आहे. मात्र, स्वच्छतेकडे लक्ष देताना शहरात वाढणार्या अतिक्रमणांकडे पालिकेचे झालेले दुर्लक्ष डोकेदुखीचे ठरले आहे. ठिकठिकाणी रस्त्यालगत लागणारे गाडे, खोकी, टपर्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे े. त्यामुळे पादचार्यांसह वाहनधारकांना रस्त्यावरून ये – जा करताना जीव मुठीत घ्यावा लागतो. पालिका प्रशासन अथवा पदाधिकार्यांनी याकडे कधीच गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे सध्या कृष्णा नाका ते दत्त चौक तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यालगत अतिक्रमणे वाढलेली दिसतात. कृष्णा नाका ते कृष्णा पुलांपर्यंत रस्त्याच्या बाजूला विक्रेत्यांनी केलेली अतिक्रमणे वाहतूक कोंडीला निमंत्रण देणारी ठरत आहेत. अतिक्रमण करून बरेच दिवस झाल्याने संबंधितांना ती जागा हक्कांची वाटू लागल्याचे दिसून येते. त्यामुळे एखादे वाहन समोर अथवा जवळपास थांबल्यास ते तेथून हटवण्यासाठी अरेरावी करतात.
शहरातील कोल्हापूर नाका, दत्त चोक, भेदा चौक , मार्केट यार्ड गेट नं. 1 ते कार्वे नाका टॉवन हॉल परिसर भाजी मंडई कृष्णा नाका या परिसराला हात गाडे खोकी पानटपर्या कलिंगड विके्रते इत्यादींनी वेढले आहे. त्यातच भरीला भर म्हणून वडापच्या जीप रिक्षा जागा दिसेल तिथे थांबत असल्याने वाहतूकीचा बट्टयाबोळ झाला आहे. तरीही नगरपालिकेचे लेाकप्रतिनिधी व प्रशासन यांची दखल घेत नाहीत. तरी त्यांनी ही गांधारीची भूमीका सोडून सुदंर शहराची कल्पना राबवावी. अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
कराड शहराला अतिक्रमणांचा विळखा : पालिकेचे दुर्लक्ष
RELATED ARTICLES

