कराड: शासकीय रूग्णालयात विविध आजारांचे रूग्ण यांना एकाच प्रकारचा आहार दिला जात होता. मात्र, शासनाच्या आरोग्य विभागानेही आता तब्बल 30 वर्षानंतर आहार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता बालकांना, प्रौढांना व मधुमेह, हृदयरोगी, मुत्रपिंड रोगीसह इतर आजारंाच्या रूग्णांना वेगवेगळया पध्दतीचा आहार देण्यात येणार आहे. नुकताच शासनाने त्यासंदर्भातील आदेश निर्गमित केला आहे.
शासकीय रूग्णालयात सेवा घेण्यासाठी येणारे बहुतांश रूग्ण हे सर्वसामान्य कुटुंबातीलच असतात. त्याचा विचार करून शासनाने त्यांना रूग्णालयात भरती झाल्यानंतर जेवण खाण्याचा आर्थिक भुर्दंड बसू नये, यासाठी मोफत आहार देण्याची व्यवस्था केली आहे.
त्यांतर्गत राज्यातील जिल्हा रूग्णालये, महिला रूग्णालये, संदर्भ सेवा रूग्णालये, संदर्भ सेवा रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, मनोरूग्णालये, क्षय रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये येथे उपचारासाठी दाखल होणार्या रूग्णांना चांगल्या दर्जाचा आहार देण्याची व्यवस्था शासनाने केली होती. त्यावेळीपासुन आजतागायत सर्व प्रकारच्या रूग्णांना गेली 30 वर्षे एकच आहार दिला जात होता.
मात्र, अलीकडे लहान मुलांचे आजार, प्रौढांचे आजार, त्याचबरोबर झपाटयाने वाढत असलेले मधुमेहाचे रूग्ण, हृदयविकाराचे रूग्ण, मूत्रपिंडाच्या विकाराचे रूग्ण भाजलेले रूग्ण हे त्यांना त्या आजारातुन लवकर बरे होण्यासाठी विशिष्ट प्रकारचा आहार घ्यावा,असे डॉक्टरांकडुन संागण्यात येते त्याला अनुसरून शासकीय रूग्णालयात देण्यात येणार्या आहारामध्येही आजाराप्रमाणे बदल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडुन लहान मुले,प्रौढ व्यक्ती, मधुमेहाचे रूग्ण मुत्रपिंडाच्या विकाराचे रूग्ण, भाजलेले रूग्णांनी जेवण, फळे, दूध, चहा, नाष्टयासह अन्य सात्विक आहार देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
आजारानुरूप मिळणार आहार; शासकीय रूग्णालयात 30 वर्षानंतर होणार बदल
RELATED ARTICLES