सातारा :- महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करुन महाराष्ट्रातील सर्व तालूके पाणीदार करण्यासाठी सिनेस्टार ,अभिनेता आमिर खान यांच्या पुढाकाराने “पाणी फाऊंडेशन” या संस्थेमार्फत ‘वॉटर कप’ स्पर्धेचे २०१६ पासून आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत यावर्षी सुद्धा दि.१ मे महाराष्ट्र दीनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशन तर्फे महाराष्ट्रातील सर्व जलमित्रांना एक दिवस महाश्रमदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आपल्या लाडक्या व प्रेरणास्थान असलेल्या श्री. आमिर खान यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सातारा येथिल आमिर खान फॅन क्लब चे सदस्य साहिल बागवान, तुषार कुंभार, आफताब कलाल, रोहित लाहोटी, वसीम बागवान, स्वप्नील लाहोटी व सुशांत पाटील, स्वप्निल खंडेलवाल यांनी दरवर्षी प्रमाणे वॉटर कप स्पर्धेमध्ये महाश्रमदानासाठी नोंदणी करून सहभाग नोंदवला.
आज दि.१ मे २०१९ रोजी आमिर खान फँन क्लबच्या सदस्यांनी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सोळशी या गावी श्रमदान केले. यावेळी श्रमदाननासाठी इतर जिल्ह्यातून आलेल्या अबाल-वृद्ध जलमित्रांचा व सोळशी ग्रामस्थांचा सहभाग आणि उत्साह अप्रतिम होता. सोळशी ग्रामपंचायत व सर्व गावकऱ्यांनी एकजुटीने दुष्काळाला पाणी पाजण्यासाठी केलेली तयारी पाहून सर्व सहभागी भारावून गेले. बळीराजा ३६५ दिवस आपल्यासाठी राबतो आज आपण त्याच्या साठी एक दिवस राबलो याचा एक मनस्वी आनंद व समाधान सर्वांना होता.आपण सुद्धा समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आमिर खान फॅन क्लब, सातारा तर्फे श्रमदानाच्या ठिकाणी सोळशी गाव पाणीदार बनविन्या हेतुन्वये पुढील जलसंधारणाच्या कामासाठी खारीचा वाटा म्हणून रु.७०००/- चा धनादेश ग्रामस्थ व पाणी फाऊंडेशन च्या कु. मोनाली शेळके यांच्या उपस्थितीत गावच्या सरपंच सौ.अनिता यादव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. आणि पाणी फाउंडेशन शी सलग्न असलेली स्नेहालय या संस्थेस सुद्धा वॉटर कप स्पर्धेची नोंदणी करताना ₹१०००/- देणगी स्वरुपात दिले यावेळी श्री.जिवन सोळस्कर,सोळशी गावचे रहिवासी, महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून आलेले जलमित्र मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आमिर खान फँन क्लब, सातारा तर्फे सर्व जनतेला पाणी फाऊंडेशन च्या पुढील वर्षी होणाऱ्या वॉटर कप स्पर्धेत व चळवळीत सहभागी होण्याचे नम्र आवाहन करण्यात आले.
आमिर खान फॅन क्लब, सातारा तर्फे सोळशी ता. कोरेगाव गावास वॉटर कप स्पर्धेसाठी मदत
RELATED ARTICLES