वाईः अनेक अडचणीतून मार्ग काढत वाई नगरपालिकेचा जलतरण तलाव पूर्ण झाल्याने वाईकरांना पोहोण्यासाठी एक पर्याय निर्माण झाला आहे. राज्यातील 384 नगरपालिकांपैकी वाई नगरपालिकेकडे हा सेमी ऑलिंपिक दर्जाचा जलतरण तलाव तयार करण्यात आला असल्याने, या जलतरण तलावाने वाईच्या वैभवात भरच पडली आहे, वाई नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावा हा वाईकरांच्या सेवेत हजर झाल्याने दुष्काळाची परिस्थिती असतानाही वाईकरांना पोहोण्याचा आनंद मिळत आहे,नदीत पोहोण्यासाठी पाणी नाही, विहिरी कोरड्या पडल्या आहेत, कालव्यात पाणी नाही अशा परीस्थितीत ही एक पर्वणीच म्हणावी लागेल. पन्नास हजार लोकसंख्या असणार्या वाई शहरात एकच स्विमिंग पूल असल्याने पोहोण्यासाठी प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. वाई शहरात दुसरे कोणतेही ठिकाण पोहोण्यासाठी नसल्याने सर्व मदार याच जलतरण तलावावर येत आहे.
नदीची पूर्वीची व आत्ताच्या परिस्थितीत मोठा फरक पडला आहे. कृष्णेच्या पाण्यात सांडपाणी डायरेक्ट सोडण्यात येत असल्याने पाण्याला दुर्गंधयुक्त वास येत असल्याने आंघोळ करण्याचे धाडस कोणी करत नाही. त्यामुळे पोहणार्यांससाठी हा जलतरण तलाव पर्वणी ठरला आहे.
उन्हाळयाच्या दिवसात पाणी टंचाईमुळे शहरातील नागरिकांना पोहण्याचा आनंद घेता यावा यासाठी जलतरण तलाव महत्वपूर्ण आहे. तसेच पोहण्यासारखा दुसरा व्यायाम नाही. रस्ते, इमारती बांधणे सोपे असते परंतू जलतरण तलाव बांधणे व त्याची देखभाल दुरूस्ती ही निरंतर चालणारी किचकट प्रकिया आहे. सेमी ऑलिंपिक दर्जाचा जलतरण तलावाची उभारणी वाई नगरपालिकेने केल्याने स्पर्धांचे नियोजन या ठिकाणी करण्यात यावे अशीही मागणी वाईकर नागरिकांमधून करण्यात येत आहे, परंतु सध्या तरी काही अंशी पोहोणारयांचा प्रश्न मार्गी लागण्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वाई शहरात काही खाजगी स्विमिंग पूल आहेत ते सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाहीत,तरी वाईकर नागरिकांनी याचे भान ठेवणे गरजेचे आहे, कि हा तलाव काही कारणांनी बंद पडणार नाही, याची काळजी वाईकरांनाच घ्यावयाची आहे.
हजारोंची लोकसंख्या असणार्या वाईकरांची एकाच जलतरण तलावावरच पोहण्यासाठी भिस्त
RELATED ARTICLES