साताराः शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्यांनी कुलपती तथा महामहिम राज्यपाल सी विद्यासागर राव यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना विद्यापीठाचे विविध शैक्षणिक ऊपक्रम तथा अभिनव प्रकल्पांचे सादरीकरण करुन प्रगतीचा आढावा सादर केला. या प्रसंगी डॉ. विवेक खानझोडे, अॅड. धैर्यशील पाटील, डॉ. भारती पाटील, डॉ. डी. जी. कणसे, डॉ. सी. टी. कारंडे, संजय जाधव, भिसे हे व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी राज्यपालांचा सातारी कंदी पेढे, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटर, सेंटर फॉर नेनो-टेक्सटाईल, व्ही.एस्.एल.आय. सेंटर, क्रिडा क्षेत्रातील राज्य, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व सहाय्य, कौशल्य विकास केंद्र, इंडो-जर्मन टूल जिम, जलसंधारण व जल शुद्धीकरण प्रकल्प तसेच बेटी बचाव, स्वच्छ भारत अभियान अशा राष्ट्रीय कार्यक्रमांसह अनेक योजनात शिवाजी विद्यापीठाने दिलेल्या योगदानाविषयी माहिती देण्यात आली.
सदर उपक्रमांच्या यशस्वी वाटचालीविषयी समाधान व्यक्त करुन विद्यापीठाने संशोधनावर भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीस शासनाचे पाठबळ राहील असा विश्वास राज्यपालांनी याप्रसंगी दिला.
शिवाजी विद्यापीठाने ऊस, गुळ व चर्मोद्योग यामधील संशोधनावर भर द्यावाः कुलपती सी विद्यासागर राव
RELATED ARTICLES