वडूज : खटाव तालुक्यात काही महिन्यांपूर्वीच नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार अर्चना पाटील यांनी अवैध वाळू उपसा करणार्या ठिकाणी धाड टाकत काही वाहनांवर व वाळू साठे जप्त करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या कारवाईत सातत्य राहिल्यास निश्चित अवैध वाळू उपसा करणार्यांना लगाम बसणार आहे.
काही महिन्यांपूर्वी खटाव तालुक्यात बेसुमार बेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता. अगदी दिवसाढवळ्या नदीच्या पात्रात जेसीबी मशीन व मजुरांच्या कडून खुलेआम बेसुमार वाळू उपसा होत असल्याचे समोर आले होते . यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी अवैध वाळू उपसा करणार्यांवर कारवाई केली होती.
विशेषतः बेकायदेशीर वाळू उपसा करणार्या माफियांवर कारवाई करण्यासाठी प्रांत कार्यालयाकडून भरारी पथकाची स्थापना ही करण्यात आली होती. मात्र दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरू असून ही हे पथक गेल्या काही महिन्यांपासून गायब झाले होते.
मात्र आता नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार अर्चना पाटील यांच्या यांनी बेधडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मार्च महिन्यात त्यांनी विखळे ता खटाव येथे अवैध वाळू उपसा करून वाहतुक करणार्या तीन डपंर वर कारवाई करून 4 लाखांचा दंड वसूल केला होता. तर त्याच ठिकाणी 18 ब्रास असलेला वाळू साठा जप्त करून तहसील कार्यालयात आणला होता.
दरम्यान निवडणुकीच्या कालावधीत मायणी येथे एका पिकअप वाहनातून वाळू वाहतूक होत असल्याचे समजल्यानंतर तिथे जाऊन ते वाहन ताब्यात घेतले होते. तर वडूज येथे एका डंपर वर कारवाई करून तीन ब्रास वाळू व वाहन जप्त केले. तसचे काल दि 2 रोजी रात्री दीड वाजता खटाव व विटा तालुक्याच्या हद्दीत मायणी येथील खरात वस्तीच्या हद्दीत 30 ब्रास वाळूचा साठा जप्त करून त्यांपैकी 20 ब्रास वाळू खटाव तहसील कार्यालयात आणण्यात आला तर उर्वरित वाळू विटा तहसील कार्यालयात नेण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार अर्चना पाटील यांनी दिली.
या कारवाईत मायणीचे तलाठी एस व्ही चाटे, वडूज चे पी बी घोरपडे, मंडलाधिकारी शरद सानप तसेच भूषणगड, मोराळे, तरसवाडी चे तलाठी यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. महसूल विभाग सतर्क झाल्याने वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. तर प्रशासनाने कारवाईत सातत्य ठेवने गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
फेरअहवालाची मागणी : डॉॅ. पाटील
याबाबत तहसिलदार डॉ. अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एनकूळ चारा छावणीचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. गावात नक्की चार्याची काय अवस्था आहे. यासंदर्भात कृषी विभाग व महसूलच्या स्थानिक कर्मचार्यांकडून अहवाल घेतला जाईल. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर छावणी सुरु करण्यासंदर्भात आदेश दिले जातील.
तहसिलदारांची अवैद्य वाळू व्यवसायावर मोठी कारर्यवाही
RELATED ARTICLES