तस्करी टोळीचा राज्यस्तरीय टोळीशी लागेबांधे * आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी
वाई : वेळे, ता. वाई परिक्षेत्रात खैर तोडून विनापरवाना वाहतूक करून साठा केल्या प्रकरणी व शिकार करण्याच्या उद्धेशाने वाघर (जाळी), काठ्याव हत्यारे बाळगल्याने वन विभागाने धडक कारवाई करून आठ आरोपीना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडील माल हस्तगत करण्यात आला आहे. सर्वजण रा. सरोलीपाडा जव्हार,ता.जि.पालघर येथील आहेत. त्यांच्यावरजैवविविधता कायदा 2002 चे कलम 3,7 अन्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.
आरोपींना वाई येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना तीन दिवसांची वणकोठडी ठोठावली आहे.आरोपींमध्ये रवींद्र रामजी जाधव- वय- 24 योगेश सीताराम जाधव वय- 23, इन्द्रेश काषु जाधव वय- 27, सीताराम महादू जाधव वय- 50, काषु चैतू जाधव वय- 55, लक्ष्मन देवाजी जाधव वय- 28, अनिल रमेश जाधव वय- 23, सुनील काषु जाधव वय- 24 सर्व राहणार सरोलीपाडा जव्हार (ता.जि.पालघर) येथील आहेत. हि कारवाई उपवनसंरक्षक- डॉ.भारत सिंह हाडा,सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरन) बढाले यांच्या मार्गदर्शनाखाली वाई वनक्षेत्रपाल-महेश झाजुर्णे, वनपाल रत्नकांत शिंदे, सुरेश सूर्यवंशी वनरक्षक- लक्ष्मण देशमुख, अजित पाटील, वैभव शिंदे, प्रदीप जोशी यांनी केली.खैर हा परवानगी शिवाय तोडू शकत नाही.
आरोपी कोणाच्या सांगण्यावरून खैर तोडत होते.तोडून ते कोणाला विकणार होते. कोणत्या वन्यप्राण्याची शिकार केली आहे का? या गुन्ह्याचा अधिक तपास करून खैर विनापरवाना तोडून विकणार्या टोळीचा छडा लावणाच्या दृष्ठीने, व आरोपीच्या मुळाशी तपास करण्याच्या दृष्ठीने वाईचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे तपास करीत आहेत. लाकूड तोड टोळीचा तपास लवकरात-लवकर लावण्याची मागणी जोर धरत आहे. वनक्षेत्रपाल- महेश झांजुर्णे या मार्गदर्शनाखाली वाई वनविभागाने गेल्या काही महिन्यात अनेक धडक कारवाया केल्या आहेत.