वाई: वाईच्या पसरणी घाटात सिद्धनाथवाडी परिसरातील शेतकर्याने आपल्या घरी पाळलेल्या गायीला खोंड झाल्याने त्याला जास्त दुध द्यावे लागत असल्याचे कारण पुढे करीत त्या वासराला घाटातील झुडपात आणून सोडले. परंतु दररोज घाटात फिरायला येणार्या काही कार्यकर्त्यानी यांनी त्वरित प्राणी मित्राच्या लक्षात ही बाब आणून देत दोन तास भटक्या कुत्र्यांपासून त्याचे रक्षण केले. चार ते पाच कुत्रांचा कळप त्या वासरावर झडप घालण्यासाठी डूक धरून बसला होता. वाई शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकार्यांनीयाचे गांभीर्यलक्षात घेवून, प्राणी मित्र-स्वप्नील भिलारे, काशिनाथ शेलार यांनी त्वरित वेळेच्या करुणा मंदीर गोशाळेत त्याची व्यवस्था करून त्या ठिकाणी चार चाकी वाहनाच्या सहाय्याने त्याला सुखरूप पोहोचविण्यात आले. करुणा मंदिराचे विश्वस्त दीपक ओसवाल यांनी त्या वासराला करुणा मंदीर गोशाळेत ठेवून मोलाचे सहकार्य केले. फिरायला येणार्या वाईकर नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्याने पुढचा अनर्थ टाळला. अशा प्रकारचे किस्से पसरणी घाटात नेहमीच घडत असतात. ज्या दुभत्या जनावरांच्या जीवावर बळीराजा आपला घर-संसार चालवीत असतो त्या जनावराच्या वासराला भटक्या कुत्र्यांच्या हवाली बिनधास्त करण्यासाठी सोडण्यात येते. ही किती चीड येण्यासारखी बाब आहे. जे नेते शेतकर्यांचे प्रश्न घेवून भांडत आहेत.त्या नेत्यांनी शेतकर्यांना या बाबत प्रबोधन करण्याची खर्या अर्थाने गरज असल्याचे आज काळची गरज होवून बसली आहे. पाळलेल्या जनावरांचे संगोपन करण्यासाठी येणार्या खर्चाचा जरी मेळ घालणे अवघड असले तरीही पंपारिक शेती न करता तिला तंत्रज्ञांनाची जोड दिल्यास शेती किफायतशीर करता येते. दुभत्या जनावराचे शेण, गोमुत्र, व मुख्य दुध हे योग्य नियोजन करून केल्यास फायदा नक्कीच होतो. त्यासाठी कोवळ्या जनावराच्या जीवावर उठण्याची गरज नाही. तसेच अशा पद्धतीने निर्दयीपणे घाटात बेवारस सोडणार्या शेतकर्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी घाटात फिरायला येणार्या संघटना करीत आहेत. तसेच थोड्याच दिवसात तशा आशयाचे निवेदन वाई पोलीस ठाण्यात देण्यात येणार असल्याचे या संघटनांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पसरणी घाटात बेवारस वासराला प्राणीमित्रांमुळे मिळाले जीवदान
RELATED ARTICLES