Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीबावधन परिसरात डोंगरावर दररोज पाणी घालून झाडांना जीवदान देणारा अवलिया

बावधन परिसरात डोंगरावर दररोज पाणी घालून झाडांना जीवदान देणारा अवलिया

वाई : तालुक्यातील बावधन या गावात एकअवलिया रोज कावड घेऊन जाताना दिसते. बर्‍याच वेळा ते कावडीने पाणी घेऊन डोंगरावर जावून झाडांना पाणी घालण्याचे पवित्र काम करीत आहेत. त्यांचे अखंड कार्य गेले तीस वर्षे झाले चालू आहे.
संजयभोसले असे दररोज कावडीने पाणी घेऊन जाणार्‍या या काकांचे नाव आहे. सकाळी 6 वाजता ते घरातून कावड घेऊन निघतात.नळाचे पाणी भरून बावधन शेजारी असणार्‍या डोंगरावर जातात.तिथे त्यांनी लावलेल्या झाडांला ते पाणी घालतात. हे काम ते गेल्यातीस वर्षांपासून करीत आहेत. झाडांविषयी प्रेम व्यक्त करताना ते म्हणाले, हे काम करत असताना खूप लोकांनी अवेहलना केली, काही लोक हसले, परंतु मला याची मनापासून आवड असल्याने मी हे झाडांला पाणी घालण्याचे काम गेल्या 30 वर्षांपासून अखंडित करत राहिलो. या कामाची बावधन गावाने दखल घेऊन सत्कार केल्यावर मात्र हसणार्‍या लोकांची तोंड बंद झाली. संजय भोसले यांना एका व्यक्तीने विचारले की तुला यातून काय मिळते.त्यावर संजय भोसलेयांनी अतिशय मार्मिक उत्तर दिले, मला या कामातून आत्मिक आनंद मिळून मिळतो,मला आता याची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यायाम देखील होतो व झाडांची जोपासना करताना त्यांची जसजशी वाढ होते तसे मानसिक समाधान देखील मिळते.
हा छंद जोपासताना संजय काकांला बर्‍याच कटू अनुभवांचा देखील सामना करावा लागला.त्यामध्ये तुला दुसरं काही काम नाही का? या लष्कराच्या भाकर्‍या कश्याला भाजतोस? म्हणून हिनवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला परंतु जी माणसे त्यांच्या दारात तुळस लावत नाहीत ती झाडे काय लावणार असा विचार करून या लोकांच्या नादी न लागता शेकडो झाडांला पाणी घालून ती जगवण्याचे काम चालूच ठेवले असे ते आवर्जून सांगतात.
पाची देवळाच्या आजूबाजूला डोंगरावर बरीच झाड हि चांगल्या स्थितीत दिसून आली.या डोंगरावर सर्वच झाड संजय काकांनी लावली नसली तरी जी झाड आहेत त्याला मात्र ते दररोज पाणी घालतात.गावातील काही तरुणांनी व फॉरेस्ट डिपार्टमेंटने देखील काही झाड लावल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.काही झाडे हि नुसती लावण्यात आली पण पाणी घातले नसल्याने जळून गेल्याचे संजय काकांनी अशी जळालेली झाडे दाखवून सांगितले.लोकांच्यात झाडे लावण्याच्या संदर्भात जनजागृती करणे खूप गरजेचे आहे. लोकांनी किमान एक झाड लावले व त्याची जरी काळजी घेतली तरी पुरेसे आहे असे सांगून संजय काकांनी झाडांचे महत्व अधोरेखित केले. संजय काका हे काम विना मोबदला करतात.त्याबदल्यात ते फक्त अपेक्षा करतात ती फक्त काही सुविधांची. त्या सुविधा म्हणजे एक पाण्याची टाकी जर डोंगरावरती झेंड्याच्या इथेग्रामपंचायतीच्या माध्यमातून बांधली तर देवस्थान बरोबर झाडानाही मुबलक पाणी घालता येईल व अजून झाडांची संख्या वाढवता येईल असेही त्यांनी मत प्रकट केले.
संजय काकांनी पाची देवळाच्या इथे लावलेले बदामाचे झाड काही कारणास्तव तोडल्याची खंत व्यक्त केली व त्याच बरोबर कमानीच्या इथे सुंदर रबराचे झाड लावल्याचे अभिमानाने सांगतात.गावातील तरुण वर्गाने पारावर वेळ वाया न घालवता आपले शिक्षण सांभाळून अश्या विविध सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे.बरीच झाड लावली, जगवली व मी अजून झाड लावणार त्यासाठी घरी रोप तयार करणे व काही झाडांच्या बिया गोळा करण्याचे काम शिवनकामाचा व्यवसाय सांभाळून मी करत राहणार असल्याचे संजय काका सांगून त्यांचे भविष्यातील नियोजन स्पष्ट करतात. कोणताही मोबदला मिळत नसताना संजय काका करत असलेले काम पाहिल्यावर त्यांला सलाम केल्यावाचून राहवत नाही.हे काम करत असताना झाडांची संख्या लक्षात घेता त्यांना एकट्यालाच सर्वच झाडांना दररोज पाणी घालणे जमत नाही.त्यावर त्यांनी झाडांची काही ठराविक भागांमध्ये विभागणी केली आहे.त्यानुसार ते दररोज पाणी घालण्याचे काम करतात.
संजय काकांचे काम खरंच कौतुकास्पद आहे.गरज आहे ती फक्त त्यांला मदत करण्यासाठी अजून काही हात पुढे येण्याची.पण या श्रेयवादाच्या लढाईत असे हाथ पुढे येतील कि नाही यात शंकाच आहे.पण तरीही या शंकेवर मात करून सर्वांनी थोडा हातभार लावला तर मुरुमात देखील नंदनवन फुलल्याशिवाय राहणार नाही हेच खरे….!

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular