म्हासुर्णे : खटाव तालुक्यातील चोराडे गावातील सटवाईचा वटा समोरील खांब गजलेमुळे व कोंडीदाजी घरासमोरिल खांब वाकला असुन तो कधीही शेजारील घरावरती पडु शकतो त्यामुळे हे खांब अखेरची घटका मोजत आहेत.
त्यामुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना घडु शकते यासाठी विदयुत महामंडळाने तात्काळ या ठिकाणी नवीन खांब बसवुन उपाययोजना करावी अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.
विज वितरण कंपनीच्या पुसेसावळी फिडरवरुन चोराडेला गावाला विज पुरवठा केला जातो. परंतु या फिडर वरुन अनेकवेळा विजपुरवठा सुरळीत चालत नसल्यामुळे उन्हाळयाच्या दिवसात ग्रामस्थांना गरमीला सामोरे जावे लागत आहे.
तरी या खाबांची अवस्था दयनीय झालेली आहे.पोलच्या जमिनीजवळचा भाग पुर्णपणे गंजलेला असुन निकामी झालेला आहे. त्यामुळे काही भागावरच पोल उभा आहे.तसेच दुसरा खांब पुर्ण पणे वाकलेला असुन त्याला तान नाही त्यामुळे या खाबांवरील तारांचे वजन तसेच वार्याच्या दाबाने हे खांब कधीही कोसळु शकतात. त्यातच हे खांब रहदारीच्या ठिकाणी असल्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास यास विज वितरण कंपनीच जबाबदार राहील असा इशाराच इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.
तसेच याबाबत वारंवार विज वितरणच्या अधिकार्यांना सांगुनही याबाबत काहिही कार्यवाही करण्यात आली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये विज वितरणच्या कारभाराबाबत नाराजीचा सुर निघत आहे.
आता मे महिना सुरु असल्यामुळे वळवाच्या पावसात हे पोल टिकणार नाहित त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.त्यामुळे अनेक दिवसापासून या खांबावरील स्टेटलाईटचे बल्प गेले आहेत ते बसविण्यासाठी कोणही खांबावर चढत नाहीत. त्यामुळे याविभागात रात्रभर अंधार असतो.
चोराडे येथे वीज विद्युत कंपनीच्या खाबांची ग्रामस्थांच्या जिवावर टांगती तलवार
RELATED ARTICLES