सातारा (एकनाथ थोरात) : बलवंत फौंडेशनच्या वतीने शेतकर्यांना दु:खातून व नैसर्गिक आपत्तीमधून ,दुष्काळी परिस्थिती मधून बाहेर काढण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न हे कौतुकास्पद असून सामाजिक बांधीलकी जोपासणार्या बलवंत फौऊंडेशनला शासनामार्फत सर्व प्रकारचे पाठबळ दिले जाईल अशी ग्वाही कूषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. शनिवारी त्यांनी आंधळी येथील बलवंत फाऊंडेशनच्या चारा छावणीस भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते.
. यावेळी आ जयकुमार गोरे,बलवंत फांऊंडेशनचे प्रणेते बलवंत पाटील,बलवंत फाऊंडेशनचे चेअरमन सचिन शिंगाडे,व्हाईस चेअरमन चारूशीला पाटील,माजी डेप्युटी सीईओ टि.आर.गारळे रासपचे अध्यक्ष मामूशेठ वीरकर, ,छावणीचालक संगीता शिंगाडे,अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी चारा छावणीची पाहणी केली तसेच शेतकर्यांशी संवाद साधला व विविध अडीअडचणी समजावून घेतल्या. या चार छावणीमध्ये एकूण 975 जनावरे दाखल असून याठिकाणी नियमित जनावरांना चारा,पशूखाद्य,पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली. याठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवण्यात आला असून शेतकरी, जनावरांना वैद्यकीय सुविधा ही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यावेळी चारा छावणीची व्यवस्था पाहून सदाभाऊ खोत यांनी समाधान व्यक्त केले. आ.जयकुमार गोरे म्हणाले बलवंत पाटील यांनी समाज सेवेचे व्रत स्वीकारून एक वेगळा पायंडा जोपासला आहे. दुष्काळी भागातील शेतकर्यांसाठी त्यांनी केलेल्या उपाययोजना गौरवास्पद आहेत. प्रशासकीय पातळीवर कोणतीही अडचण आल्यास आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची माहिती दिली.दरम्यान आंधळी येथील चारा छावणीस राज्याच्या विविध भागातील मान्यवर तसेच माण तालुक्यातील विविध ठिकाणी कार्यरत असणारे उद्योजक ,अधिकारी भेट देत असून शेतकर्यांना मदतीचा हात देत आहेत अशी माहिती बलवंत पाटील यांनी दिली.
यावेळी त्यांनी सांगितले जोपर्यंत पाऊस पडत नाही दुष्काळी परिस्थिती आटोक्यात येत नाही तोपर्यंत ही चारा छावणी आपण सुरू ठेवणार आहोत. दरम्यान आंधळी येथील चारा छावणी मध्येच फक्त ट्रँक्टरमधील कडबाकुट्ठी यंत्राद्वारे ऊस,कडवळ,मका बारीक करून व वजन करून शेतकर्यांकडे दिला जात आहे. त्यामुळे शेतकर्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. मोठ्या संख्येने शेतकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.
शासनामार्फत चारा छावणीतील जनावरांना प्रतिदिन यामध्ये मोठ्या जनावरास 90रुपये व लहान जनावरास 45रुपये अनुदान दिले जात आहे मात्र त्यामध्ये वाढ करून हे अनुदान मोठया जनावरास नियमित 120रुपये व लहान जनावरास 60रुपये करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.सध्या कमी अनुदानात पूर्वी असणारे हिरवा चार्याचे प्रमाण बदलल्याने खर्च भागविणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर शेतकर्यांना एका रेशनकार्ड मध्ये फक्त पाचच जनावरे चारा छावणीत ठेवण्याची परवानगी मिळत आहे. त्यामुळे विभक्त नझालेल्या शेतकर्यांची एकाच रेशनकार्ड मध्ये नावे असल्याने पंधरा ते वीस जनावरे दावणीला असूनही फक्त पाचच जनावरे चारा छावणीत दाखल करता येत आहेत त्यामुळे शासनाने रेशनकार्ड मधील पाच जनावरांची अट शिथील करावी अशी मागणी यावेळी शेतकर्यांनी कूषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे केली .
सदाभाऊ खोत यांचा आंधळी येथील बलवंत फैंडेशनच्या चारा छावणीला भेट
RELATED ARTICLES