सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजवाडा शाखेचा नुतनीकरण उदघाटन कार्यक्रम गुरुवार दि. 16 मे 2019 रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांचे शुभहस्ते, आणि आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अध्यक्षतेखाली तसेच खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख सौ तेजस्वी सातपुते म्हणाल्या, या नवीन वास्तुचे नुतनीकरण कार्यक्रमास मला बोलवून मला खूप आनंद होत आहे भाऊसाहेब महाराजांचे स्मृतींना उजाळा म्हणून या दिवषी हा कार्यक्रम ठेवला आहे तसेच भाऊसाहेब महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण या प्रसंगी करण्यात आले, ही चांगली बाब आहे. ग्राहकांचा मिळविलेला विश्वास हाच जिल्हा बँकेचा सर्वोत्तम पुरस्कार असलेचे गौरोवदगार काढले. बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के आहे ही बाब अत्यंत चांगली आहे. बँक कर्ज देताना सक्षम कर्जदारांना कर्ज देते. बँकेची कर्ज वसुली चांगली आहे बँकेचे टीम वर्क आणि प्रशासन व आर्थिक शिस्त चांगली आहे. रु 3.00 लाखापर्यंत शून्य टक्के दराने कर्ज देते ही चांगली बाब असून बँक अन्नदात्याला मदत करते. बँकेने असेच चांगले कामकाज करावे व उत्तरोत्तर बँकेची अशीच प्रगती होवो अश्या शुभेच्छा दिल्या. आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, या बँकेला सुरुवातीपासूनच यशवंतराव चव्हाण, आबासाहेब वीर, आर. डी. पाटील, भाऊसाहेब महाराज इत्यादि नेत्यांचे चांगले नेतृत्व लाभलेमुळे बँकेची चांगली प्रगती झालेली आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये तीव्र स्पर्धा असून आपल्या बँकेने खाजगी बँकेप्रमाणेच ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सुविधा उपलब्ध करून देणेसाठी सदैव प्रयत्न केले आहेत. स्व. भाऊसाहेब महाराजांचे बँकेच्या प्रगतीत मोलाचे योगदान आहे. बँक आर्थिक दृष्ट्या सक्षम असून बँकेची यशस्वी घौडदौड सुरु आहे. बँकेच्या राजवाडा शाखेतील ग्राहकांना आधुनिक व जलद सेवा सुविधा देता याव्यात यासाठी कॉर्पोरेट लुक दिला आहे. आपली बँक देशातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये अग्रगण्य बँक आहे म्हणून आपल्या बँकेचे कामकाज पाहणेसाठी देश / परदेशातील लोक भेटी देत असतात. बँक आरबीआय/नाबार्डचे मार्गदर्शक सुचनांनुसार कामकाज करीत असते त्यामुळेच बँकेला उत्कृष्ट कामकाजाचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.बँकेचा ग्रॉस एनपीए अत्यंत कमी असून नेट एनपीए शून्य टक्के आहे. बँकेच्या 68 वर्षाच्या इतिहासात बँकेला चालू वर्षी विक्रमी म्हणजे रु 126.00 कोटींचा करोत्तर नफा झालेला आहे. बँकेने कोअर बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना आरटीजीएस/एनईएफटी, मोबाईल बँकिंग सारख्या आधुनिक बँकिंगच्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच अधिकाधिक सामान्य ग्राहकांपर्यंत बँकिंग सुविधा मिळाव्यात याकरिता शहरी व ग्रामीण भागात शाखा कार्यान्वित केल्या आहेत. यावेळी बँकेच्या विकासाभिमुख योजनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, आजचे युग हे स्पर्धेचे असून यामध्ये सहकारी क्षेत्रातील काही ठराविक बँका राष्ट्रीयकृत/खासगी बँकांचे बरोबरीने सेवा देत असून यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सर्व सेवा देत आहे त्यामुळे बँकेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बँकेच्या कामकाजामध्ये राजकीय हस्तक्षेप केला जात नाही यामुळे बँक आर्थिकदृष्टया भक्कम आहे. मागील 5 वर्षांत बँकेची चांगली प्रगती झालेली आहे. संचालक मंडळाने घेतलेली ध्येय धोरणे राबविणेचे काम टीम वर्क म्हणून अधिकारी/सेवक करीत असतात.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले बँकेने उत्तम कामकाज केलेमुळेच बँकेला उल्लेखनीय यश प्राप्त झालेले आहे. भारतात 371 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका असून सातारा जिल्हा बँक आर्थिक दृष्ट्या सक्षम असून देशात बँकेचा नावलौकीक आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचारांची जोपासना करणारी हि बँक असून,सातारा जिल्हयातील शेतकरी व सर्वसामांन्यांच्या आर्थिक विकासाकरीता काम करणारी बँक म्हणून सर्वदूर नावलौकिक झालेला असलेचे त्यांनी नमूद केले .बँकेने शंभरहून अधिक कर्ज योजनांच्या माध्यमातून चांगले कामकाज केले आहे.बँक विकास संस्थेच्या माध्यमातून शेतकरी सभासदांचे आर्थिक जीवनमान उंचावणेसाठी चांगले प्रयत्न करीत असलेचे सांगितले. बँकेच्या उत्कृष्ठ कामकाजामुळे बँकेस जवळपास ऐंशी पुरस्कार प्राप्त झालचे सांगितले. बँकेचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला असून बँकेने सहकारी बँकिंग क्षेत्रापुढे चांगला आदर्श निर्माण केला आहे. स्व. भाऊसाहेब महाराज यांचे मूल्यधिष्ठित विचारांवर व अध्यक्ष मा.आ.श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मार्गदर्शनाखाली बँक प्रभावी कामकाज करत असलेचे सांगितले.बँक नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत असून यावर्षीही बँकेला झालेल्या नफयातून 45 टक्के नफा जिल्हयातील शेतकरी सभासदं व सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी राखून ठेवला आहे .जिल्हयाच्या एकूण 30 लाख लोकसंख्येपैकी 20 लाख बँकेचे खातेदार असून बँक 272 शाखा व 46 विस्तारीत कक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना सेवा देत आहेत . जिल्हयातील सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबवित असलेल्या विविध कर्ज योजना, कर्ज वसुलीबाबत सतर्कता, प्रभावी वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ठ निधी नियोजन, शुन्य टक्के निव्वळ एन .पी .ए ., दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमूख सेवा यामुळे बँकेचा नावलौकीक देशभर पसरला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे व्यवस्थापक सुजित शेख यांनी केले.या कार्यक्रमास बँकेचे संचालक मा. श्री. प्रकाश बडेकर , संचालिका सौ. कांचनताई साळुंखे बँकेचे सरव्यवस्थापक एम. व्ही. जाधव, आर. एस. गाढवे, विविध विभागांचे उपव्यवस्थापक, विभागीय विकास अधिकारी, व बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील ग्राहक, शेतकरी, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी अधिकारी, महिला बचत गटाच्या सदस्या, जेष्ठ नागरिक व तरुण उपस्थित होते.
ग्राहकांचा मिळविलेला विश्वास हाच जिल्हा बँकेचा सर्वोत्तम पुरस्कार !जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते
RELATED ARTICLES