पुसेसावळी : ज्या गावात महिलांनी टिकाव व खोरे हाती घेतले ती गावे पाणीदार झाली आहेत.कुटुंब सांभाळून महिला श्रमदानासाठी माळरानावर ही गोष्ट वरुडकरांच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे.दुष्काळाशी दोन हात करत येथील ग्रामस्थांचे दुष्काळाशी झगडणे सुरू आहे.दुष्काळग्रस्त प्रत्यक्ष दुष्काळ अनुभवतात. दुष्काळ अनुभवने खूप कठीण काम आहे.असे मत फेसबुक साताराची आयडॉल लावण्यवती अप्सरा पुरस्कार विजेती माधुरी पवार यांनी व्यक्त केले.
फेसबुक साताराच्या वतीने वरुड येथे महाश्रमदानासाठी दिलेल्या हाकेला आज सर्व फेसबुक सातारकर प्रतिसाद देत ते वरुड या गावी दाखल झाले.गावातील आबालवृद्ध महिला,ग्रामस्थ यांनी माळरान फुलून गेले होते.अण्णा गुडगुडे,नाळ गुडगुडे,दुष्काळ ढिश्क्याव,ढिश्क्याव या आरोळ्यांनी श्रमदान करणार्यांच्या अंगात चैतन्य आले होते.वरुडकर ग्रामस्थांच्या सोबतीला सातारा जिल्ह्यातील अनिसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून त्यांनी श्रमदान केले.गाठीभेटीच्या अटी झुगारुन ज्यांनी फेसबुकच्या जगात सातारकरांना एकत्र केलं ते आपल्या सर्वांचे व्यासपीठ फेसबुक सातारा या टीमने वरुड येथे श्रमदानासाठी केलेल्या आवाहनाला फेसबुक सातारकरांनी उदंड प्रतिसाद दिला.फेसबुक सातारकर,अनिस कार्यकर्ते व ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांनी सकाळपासून सुमारे आठ तास श्रमदान केले. लावण्यवती माधुरी पवार यांच्या श्रमदानात सामील झाल्यामुळे गावातील महिला वर्गात मोठ्या प्रमाणावर उत्साह होता. गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर श्रमदानाचे काम सुरू आहे.
ग्रामस्थांची जिद्द मोठी आहे.या सर्व ग्रामस्थांच्यामध्ये मला श्रमदान करण्याची संधी मिळाली. हा माझा खारीचा वाटा आहे.मी नशीबवान आहे की मी ग्रामस्थांचा उत्साह वाढू शकले. महिलांशी संवाद साधता आला. या जगात कष्टकर्यापेक्षा कोणीही मोठे नाही.दुष्काळी परिस्थितीत श्रमदान हेच महत्त्वाचे आहे असे मत माधुरी पवार यांनी व्यक्त केले.
वरुडचे माळरान ग्रामस्थांनी फुलले.सुमारे आठ तास श्रमदान. फेसबुक सातारा टीमचे महत्वपुर्ण काम
RELATED ARTICLES