म्हसवड : महाराष्ट्र शासनाने शेती व पिण्याच्या पाण्यासाठी केलेला कोट्यावधी रूपयांचा सरकारी खर्च मातीत गेला असे म्हणण्याची वेळ ग्रामस्तांवर आली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, रांजणी (ता.माण) व परिसरातील माळवाडी, मोटेवाडी भालवडी या गावांतील शेतीसाठीव पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी जाशी तलावातून पाणी देण्यासाठी लागणार्या कालव्यांचे कामास 2005 सालात सुरुवात करण्यात आली. दोन वर्षात साधारणपणे चार ते पाच कि.मी. कालवा यामध्ये जाशी तलाव ते रांजणी, रांजणी ते माळवाडी, रांजणी ते मोटेवाडी कालव्याचा समावेश आहे. कालवा काढत असताना दोन ठिकाणी रस्ता ओलांडला त्या ठिकाणी मोरीपुल बाधण्यात आले, रांजणी गावाशेजारी सदरचा कालवा ओढा ओलांडून नेहण्यासाठी जलसेतू उभारण्यात आला आहे. बरकडेवस्ती शेजारी पाणी साठवण तलावाच्या कामास सुरूवात करण्यात आली होती, हे काम साधारणपणे दोन वर्षेपर्यंत सुरु होते, अचानक ठेकेदाराने काम बंद केले, हळूहळू त्या कामावर असलेली यंत्रसामग्री इतरत्र हलवण्यात आली.
सदरचे काम सुमारे 80% पुर्ण करण्यात आले असले तरी उर्वरित काम पुर्ण केल्याशिवाय त्या कालव्यातून पाणी सोडता येणार नाही.
गेली सात वर्षे पाठपुरावा करुनही हे काम पुर्ण करण्यात आले नाही,हे काम पुर्ण केल्यास रांजणी माळवाडी, मोटेवाडी या गावातील शेकडो हेक्टरपर्यत शेतीला पाणी उपलब्ध होईल तसेच या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. एकीकडे विविध पाणी योजनांवर शासन कोट्यावधी रुपये खर्च करीत असताना जी कामे सुमारे 80% पूर्ण झाली आहेत व आता बंद अवस्थेत आहेत ती पूर्ण करण्यासाठी कोणतीही कार्यवाही करत नाही.
या कामावर खर्च झालेले कोट्यावधी रुपये सत्कारणी लावायचे असतील व रांंजणी व परिसरााती शेकडो एकर जमिन ओलीताखाली आणायची असेल तर हे बंद असलेले काम पुर्ण करावे, परिसरातील लोकप्रतिनिधींनी या कामी मोलाची भूमिका बजवावी अशी मागणी परिसरातुन होत आहे
रांजणीत कॅनलवर केलेला कोट्यावधी रुपयांचा खर्च वाया जाणार
RELATED ARTICLES