वाई: अनपटवाडी बावधन येथे आगी मदाचे पोहळे काढल्यानतंर पेटता बोळा वाळक्या गवतावर पडुन आग लागली. मात्र यामध्ये कुठलीही जिवीत हानी अथवा नुकसान्न झाले नाही.
वाई पालिकेचा अग्निशामक व ग्रामस्थानी वेळीच आग आटोक्यात आणली काल रात्री आठच्या सुमारास काही मदवाले आगी महू काढण्यासाठी अनपटवाडी येथील तिन्ही आंबा ओढा नावच्या शिवारात गेले. त्या ठिकाणी महू काढण्यासाठी जाळ केला.
महू काढल्यानतंर अर्धवट जळालेले पोहळे गवतावर पडून आग लागली रात्रीच्या वेळी ओढ्याजवळ आग पाहून ग्रामस्थानी तेथे धाव घेतली.विद्युत पुरवठा सुरु असल्याने विहीरीतील पाणी व घरातील पाणी बादल्याने मारून आग पसरू नये यासाठी ग्रामस्थानी प्रयल केले.आग मोठया प्रमाणात पसरली असती तर काही घराचे,जळणाचे, शेताचे नुकसान झाले असते.
यावेळी मदवाले यानी आग पाहुन तेथून पळ काढला. वाळक्या गवतामुळे आग पसरू लागली, यामध्ये किरकोळ जळण जळाले. गावकर्याच्या दक्षतेमुळ नुकसान टळले.
तर अगदी वेळेवर वाई अग्निशामक दाखल झाल्याने आग काही वेळातच आटोक्यात आली .
मधाचे पोळे काढणार्यांनी ओढ्याला लावली आग
RELATED ARTICLES