Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसातारा जिल्ह्याचा निकाल 86.26 टक्के

सातारा जिल्ह्याचा निकाल 86.26 टक्के

सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी व मार्च मध्ये घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. कोल्हापूर विभागाअंर्तगत येणार्‍या सातारा जिल्ह्याचा निकाल 86.26 टक्के लागला आहे. निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली असून त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 93 टक्के असून मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 80.47 टक्के आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा बारावीच्या परीक्षेसाठी सातारा जिल्हयातून 38241 विद्यार्थी नोंदणीकृत होते. परीक्षेस बसलेल्या 38198 विद्यार्थ्यांपैकी 32951 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 80.47 टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 93.53 टक्के होते. सातारा जिल्हयात सगळ्यात जास्त निकाल खंडाळा तालुक्याचा निकाल 89.49 टक्के तर त्या खालोखाल सातारा तालुक्याचा निकाल 88.46 टक्के लागला आहे. मंगळवारी दुपारी एक नंतर सायबर कॅफेमध्ये निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. ऑनलाईन प्रत घेण्यासाठी सातारा शहरातील सायबर सेंटर दुपारनंतर तुडुंब झाले होते.
गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी विद्यार्थी अर्ज करू शकतात हे अर्ज त्यांनी 29 मे ते 7 जून या दरम्यान करावयाचे आहे . छायाप्रत त्यांना दि 29 मे ते 17 जून या दरम्यान मिळणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ अशोक भोसले यांनी सांगितले . तालुका लिहाय निकाल पुढील प्रमाणे जावली – 80.39 कराड – 86.94, खटाव – 85.41, कोरेगाव -84.66, माणं -87.17 महाबळेश्वर -8519, फलटणं -86.42 पाटणं -80.93 वाई -84.93

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular