Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीखा. रणजितसिंह निंबाळकरांनी आमसभेत अधिकारी व कर्मचार्‍यांना सुनावले खडेबोल

खा. रणजितसिंह निंबाळकरांनी आमसभेत अधिकारी व कर्मचार्‍यांना सुनावले खडेबोल

फलटण तालुक्यातील गार्‍हाणी मांडताना अनेकांना डोळ्यातून अश्रू अनावर
फलटण : देशाला स्वातत्र्य मिळाल्यानंतर अदिवासी भागातील अनेकांना वीज मिळाली नाही हे आपण आजपर्यंत ऐकले मात्र फलटण तालुक्यातील वाखरी व वेळोशी या भागातील वाडी वस्तीवर अजून वीज पोहोचली नसल्याने एका तरुणीने सांगितले आणि अक्षरशः तिचा या बाबतीत गार्‍हाणे मांडत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले यामुळे तालुक्यात किती दुर्दशा झाली आहे हे समजून येते, माढा लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खा. रणजितसिंह नाईक यांनी दुष्काळी परिस्थिती मुळे चारा व पाणी टंचाईबाबत फलटण येथे आमसभेचे आयोजन केले होते या मध्ये सर्वसामान्य जनतेला भयावह अडचणी येत आहेत व या कामासंदर्भात कशी अडवणूक होत आहे याची माहिती दिली. या वेळी अक्षरशः खा. रणजितसिंह यांनी या सर्व गोष्टी ऐकल्यावर अधिकारी व कर्मचारी यांना खडेबोल सुनावले या वेळी समशेरसिंह नाईक निंबाळकर, आ.बाबूराव माने, दिगंबर आगवणे, अनुप शहा व अनेक मान्यवर उपस्थित होते.
माढा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आणि हारतुरे व शुभेच्छा न स्वीकारता त्यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची मिटिंग उरकली आणि थेट त्यांनी दुष्काळी दौरा सुरू केला. यामध्ये रणजितसिंह यांनी माण खटावसह सांगोला येथे दौरा आटोपून फलटण येथे आले आल्यानंतर त्यांनी सर्व अधिकारी व पदाधिकारी तसेच सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी फक्त कागदी घोडे नाचवणार्‍या अधिकार्‍यांची जनतेसमोरच सांस्कृतिक भवन फलटण येथे बैठक बोलावली या बैठकीला प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार हनुमंत पाटील प्रभारी गटविकास अधिकारी माने, नायब तहसिलदार नंदकुमार भोईटे यांच्यासह अनेक विभागाचे अधिकारी तथा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते तब्बल दीड तास बैठक उशिरा सुरू झाली तरी अधिकारी, पदाधिकारी व सर्वसामान्य लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर येताच त्यांनी हारतुरे न स्वीकारता थेट बैठकीला सुरुवात केली या मध्ये त्यांनी प्रभारी गटविकास अधिकारी माने यांना पिण्याच्या पाण्यासाठी किती टँकर सुरू आहेत या बाबत विचारणा केली त्या नंतर माने यांनी सांगितले की 36 टँकरने 98 फेर्‍या केल्या जात असून येत्या आठ दिवसात अजून 100 फेर्‍या चालू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून काही गावातील प्रस्ताव आले असून अजून कोणत्या गावातील प्रस्ताव सादर होतील त्या प्रमाणे व्यवस्था करण्यात येणार आहे.
या वेळी खा.रणजितसिंह यांनी लोकांना विचारले की काही ठिकाणी फिडिंग पॉईंट लांब पडत आहेत कोणाकडे पिण्या योग्य पाणी उपलब्ध असेल तर त्यांनी शासनाला मदत करावी असे आवाहन केले या नंतर जवळजवळ 25 हुन लोकांनी आमच्याकडे पाणी आहे ते शासनाने घ्यावे असे सांगितले, तथापि लोकांनी सांगितले की गिरवी प्रादेशिक, तसेच ढवळ आणि सासवड पाणी पुरवठा योजना कार्यान्वयीत करून त्या ठिकाणच्या गावाना त्याचा उपयोग होईल तेव्हा या बाबतीत आपण मदत व पुनर्वसन मंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बाबत विनंती करून या तिन्ही योजना सुरू कराव्यात अशी मागणी केली तर 5 कोटीहून अधिक रुपये ठेकेदाराने घेतले असतानाही फलटण शहरालगत असणार्‍या जाधववाडी (फ.) मध्ये पाणीपुरवठा योजना रखडली असून या ठेकेदारांची व संबंधित अधिकारी यांची चौकशी करून त्या ठरकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांना पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी माऊली सावंत यांनी केली असून शासन देत असलेले माणशी 20 लिटर पाणी पुरत नाही ते वाढवून द्यावे अशी मागणी केली या वेळी या योजनेची संपुर्ण माहिती मला दोन दिवसात द्यावी अशा सूचना ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी व गटविकास अधिकारी माने यांना रणजितसिंह यांनी केली आहे.
याच बरोबर महावितरणाचा भोंगळ कारभाराचा आलेख वाचताना पिंटू इवरे यांनी वीज आहे तर पाणी नाही पाणी आहे तर वीज नाही या मुळे ऐन दुष्काळत वायरमन गावात राहत नाहीत तर किरकोळ दुरुस्ती साठी अधिकारी व कर्मचारी शेतकर्‍यांना पैसे मागत आहेत या मुळे विजवीतरन च्या कारभारावर अक्षरशः हजारो तक्रारी आल्या तर काही ठिकाणी दोन दोन महिने झाले तरी डीपी ची दुरुस्ती झाली नसून पिण्यासाठी पाणी नाही मुकी जनावरे तडफडत आहेत या मुळे या भोंगळ कारभाराला महापारेशन चे अभियंता व कनिष्ठ अभियंता जबाबदार असून ते ठेकेदारांच्या बरोबर असलेल्या आर्थिक संभधामुळे हेकेखोर झाले असून त्यांची चौकशी करण्यात आली पाहिजे असे सांगत अभियंता राजदीप यांची बदली करण्यात यावी अशी अनेकांनी मागणी केली आहे.
फलटण नगरपालिका यांच्या पाणी पुरवठा योजनेतून दुष्काळी भागातील पाणी देण्याच्या नावाखाली खाजगी टँकर चालक पाणी घेत असून ते टँकर चालक मालक हजारो रुपयांना ते पाणी विकत आहेत असे सांगितले वर रणजितसिंह यांनी नगरपालिकेचे शहर अभियंता साठे यांना या बाबतीत विचारणा केली असता आजच्या आज त्या खाजगी लोकांना पाणी बंद केले जाईल असे सांगितले तर संत बापूदासनगर मध्ये पिण्यासाठी पाणी आठ दिवस झाले येत नाही असे एका महिलेने सांगताच खा.रणजितसिंह खूप चिडले आणि त्यांनी नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच कानउघाडणी केली आणि ताबडतोब शहरातील अनेक ठिकाणी पाणी पोहोचले जात नाही या बाबत अशा चुका करू नका असे सांगितले व उद्याच्या उद्या संत बापूदास नगर मध्ये पाणी द्या असे सांगितले.
याच बरोबर प्रांताधिकारी व तहसीलदार यांना विचारले की किती ग्रामसेवक, तलाठी गावात राहतात या वर त्यांना काय उत्तर द्यावे हे सुचले नाही या वेळी एकच खळबळ माजली आणि लोकांनी सांगितले की एकही ग्रामसेवक, तलाठी गावात सोडा तर फलटण मध्ये सुद्धा भेटत नाहीत असे ऐकताच खा.रणजितसिंह चिडले आणि त्यांनी खळबळ उडवून दिली की माझे स्वतः चे सातबारा/खाते उतारे एका अधिकार्‍याने तहसील कार्यालयातील दलालाबरोबर एका ठिकाणी नेले हे योग्य नसून त्या मध्ये पुरवठा शाखेचे अधिकारी जगताप होते मी म्हणून सांगतोय की कारवाई करा त्याला निलंबित करा आणि सर्व शासकीय कार्यालयातील दलाल बंद करा नाहीतर मला पुढचे पाऊल उचलावे लागेल असा दम भरला आणि तहसीलदार हणमंत पाटील यांनी सांगितले की उद्या पासूनच सर्व कार्यालयात येणार्‍या दलालांना बंद केले जाईल असे सांगितले या वेळी काही काळ सर्वांनी मिळून तक्रार केली की भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी पैसे मागतात पैसे नाही दिले तर दम देतात या मुळे मोजणीसाठी सात/आठ महिने पैसे भरले मात्र अजून मोजणी आलीच नाही उलट या विभागात खूप दलाल आहेत ते सुट्टी दिवशी कार्यालय उघडून हजारो रुपये घेत फक्त बिल्डर लोकांचीच कामे करतात या मुळे सर्वसामान्य लोकांना पैसे दिले तरच उभे करतात नाहीतर हाकलून देतात असे सांगून भूमिअभिलेख कार्यालयाचा पर्दाफाश केला या मुळे हे थांबले पाहिजे अन्यथा गाठ माझ्याशी आहे असे रणजितसिंह यांनी सुनावले व ताबडतोब लोकांना मोजणी करून घ्या असे सांगितले.
पोलिस पाटील हे पोलीस अधिकार्‍यांची नावे सांगून पैसे मागतात ते खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी धमकवत असतात या मुळे या पोलीस पाटलाची चौकशी करून कारवाई करा असे ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय बोंबले यांना सांगितले तर पोलीस पाटील हे चांगली कामे करण्यासाठी नेमलेत का का?पैसे कमवायला असा सवाल रणजितसिंह यांनी प्रांताधिकारी संतोष जाधव यांना सांगितले व त्याचा अहवाल द्या असे म्हणत कुंपण शेत खायला लागलेय अशी खंत बोलून दाखवली.
नीरा उजवा कालवा व धोम बलकवडी कालव्यात पाणी सोडावे अशी मागणी अनेकांनी केली तर धोम बलकवडी चे पाणी उद्घाटन करण्यासाठी वापरल्याने ही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे असा आरोप गिरवीचे युवा नेते जगदीश उर्फ बाळासाहेब कदम यांनी सांगितले या मुळे दुष्काळ हा धोम बलकवडीचे अधिकारी निर्मित असून त्यांनी लोकांना राखीव ठेवलेले पाणी उद्घाटनाला सोडले असा आरोप झाल्यावर दोन दिवसात सातारा येथे या बाबत बैठक बोलावणार असून या बाबतीत अनेक तक्रारी आल्या आहेत असे रणजितसिंह यांनी सांगितले तर नीरा उजवा कालव्यात पाणी सोडावे म्हणजे त्या वरती अवलंबून असलेल्या गावाना पाणी मिळेल असे सांगितले या वेळी खा.रणजितसिंह यांनी सांगितले की मी उद्या मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.चंद्रकांत पाटील, ना.गिरीश महाजन यांच्या बरोबर चर्चा करणार असून दोन्ही कडे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे सांगितले.
या वेळी बोलताना खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 23 वर्षांपुर्वी ही आमसभा आयोजित केली होती या नंतर कोणत्याही खासदाराने अथवा लोकप्रतिनिधी यांनी आमसभा बोलावली नाही या मुळे या लोकप्रतिनिधीना जनतेची दिशाभूल केली असून साठलेला राग बाहेर पडत असून या पुढे मी स्वतःलक्ष घालणार असून सर्वसामान्य लोकांची कामे करणार असल्याचे आश्वासन दिले या वेळी जयकुमार शिंदे,शिवाजीराव फडतरे,नानासो ईवरे,काकासाहेब खराडे,स्वप्नील मुळीक,प्रदीप झनझने,बजरंग गावडे यांच्या सह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

ज्या इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन मध्ये ही बैठक झाली त्या ठिकाणची अक्षरशः एवढी दयनीय अवस्था झाली आहे की खुर्च्या मोडलेल्या उंदीर,घुशी माती,दगड गोटे यांचा खच पडला होता तर घाणीचे साम्राज्य पसरलेला होता यामुळे सर्वांनी मिळून एक अपेक्षा केली की शासकीय/निमशासकीय बैठकीसाठी एकमेव ठिकाण असलेल्या सांस्कृतिक भवनाची कमीतकमी डागडुजी तरी करा अशी भावना व्यक्त केली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular