Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीवाईतील सेवाभावी संस्थेने पाणी संवर्धन व झाडे लावा झाडे जगवा चा घेतलाय...

वाईतील सेवाभावी संस्थेने पाणी संवर्धन व झाडे लावा झाडे जगवा चा घेतलाय ध्यास

वाई : सध्या राज्यात दुष्काळाची परिस्थिती असून पावसाची सुरुवात विलंबाने होणार असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पाणी संवर्धन करणे ही काळाची गरज व ते प्रत्येकाचे कर्तव्य आहे.वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात वाईतील सेवाभावी संस्थेने आपले पाणी आपल्या रानीया संकल्पनेचा ध्यास घेवून पाणी अडवा पाणी जिरवाचेकाम हाती घेवून संपूर्ण घाटात नैसर्गिक स्त्रोत असणार्‍या ठिकाणी सीसीटी बंधारे तयार करून पाणी अडवून राहण्यासाठीचे नियोजन केले आहे.
यामध्ये वृक्ष संवर्धन संस्थेचा मोठा सहभाग आहे.त्याला वाईतील इतर संघटना व स्थानिक ग्रामस्थांचा वखड्डे काढण्यासाठी मुलींचा सहभाग मोठालाभला आहे.सेवाभावी संस्थेनेजवळ-जवळशंभर सीसीटी बंधारे व दीडशे झाडांचे वृक्षारोपणासाठी खड्डे तयार केले आहेत.त्यामध्ये पावसाळ्यात पाणी साठल्यास दर वर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे.
वाई भागात पावसाचे प्रमाण इतर तालुक्याच्या मानाने चांगले असते. परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण कसे राहणार हे काही दिवसांतच समजणार आहे, हवामान खात्याने धोक्याची घंटा वाजविल्याने त्या मानाने पाऊस कमी पडल्यास पाण्याचे दुर्भिक्ष या भागातही जाणवण्याची शक्यता लक्षात घेवून पाणी संचय व वृक्षारोपण करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. पसरणी घाटात मार्च, एप्रिलमध्येच पाणी टंचाई जाणविल्याने संपूर्ण घाटात याच काही संस्थांच्या माध्यमातून पक्षांना व सरपटणारया प्राण्यांसाठी पाण्याची भांडी बांधण्यात आली आहेत.त्याचे अनुकरण इतरही तालुक्यातील घाटांमध्ये करण्यात आले आहे.
संपूर्ण चार महिन्यात पाणी न मिळाल्याने पक्षांचा या प्राण्यांचा मृत्यु झाला नाही.हेच या संस्थंचे मोठे यश आहे. पाणी टंचाईवर उपाय म्हणून वाईतील सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले आहे.हे बंधारे कृषी विभागाकडून बांधणे अपेक्षित असताना या विभागाकडून अशी कोणतेही नियोजन होताना दिसत नाही.हि अतिशय दुर्दैवाची बाब आहे.
पाणी अडवा पाणी जिरवा हि संकल्पना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्यास त्याचा परिणाम लवकर जाणवेल.त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेवून मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याची गरज आहे.तरच आपले पाणी आपल्या दारी.हि संकल्पना यशस्वी होईल.व कायम स्वरूपी दुष्काळ हटविण्यास मदत होईल.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular