पाटण :- ऐट्रासिटी कायद्याचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी गौतम बुद्ध पोर्णिमा जयंती दिवशी पाटण येथे नव्या क्रांती ला सुरवात झाली आसताना मराठा क्रांती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा च्या समन्वयकांनी एकत्र येवून मराठा – बहुजन सामाजिक ऐक्य समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामाजिक ऐक्याची पहिली बैठक रविवार दि. २ जुन रोजी सकाळी १०. ३० वा. पाटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित केली आहे. मराठा – बहुजन क्रांती मोर्चाच्या सामाजिक ऐक्य समितीत ज्यांना काम करण्याची इच्छा आहे. अशा समाजसेवक कार्यकर्त्यांनी या बैठकीस हजर राहवे असे अहवान मराठा – बहुजन क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केले आहे.
मराठा क्रांती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा च्या समन्वयकांची शनिवार दि. १८ मे रोजी गौतम बुद्ध पोर्णिमा जयंती दिवशी औपचारिक बैठक झाली होती.
या बैठकीत सामाजिक सलोखा राखण्यासाठी ऐस्ट्रासिटी कायदा गैरवापर व इतर वाद विवाद संपुष्टात आणन्यासाठी पाटण तालुका सामाजिक ऐक्य समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. अशी समिती पाटण तालुक्यातील प्रत्येक विभागात स्थापन करण्यात येणार असून या बैठकीत काम करण्याची इच्छा असणाऱ्या समाज कार्यकर्त्यांनी “पाटण तालुका सामाजिक ऐक्य समिती” च्या २ जुन २०१९ रोजी रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाटण येथे होणाऱ्या बैठकीस हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाटण तालुका डोंगर-दुर्गम असुन तालुक्याच्या प्रत्येक गावात सर्व समाज गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहे. काही ठिकाणी अपवाद वगळता किरकोळ कारणावरून सामाजिक तेढ व वाद निर्माण होतात. असे काही वाद ऐट्रासिटी सारखा गुन्हा दाखल होण्यास हि भाग पडतात. अनेक वेळा अशा वादापाठीमागे राजकीय अथवा गावगुंड समाज कंठक आपल्या स्वार्थाची पोळी बाजून घेताना दिसतात. आणि दोन्ही समाजात जातीय वाद घडवून आणतात. हा प्रकार सामाजिक ऐक्य बिघडविण्याच्या द्रुष्टीने केला जातो. अशा समाज कंठकांना बाजूला सारून सर्व समाज्यात ऐकोपा राहण्याच्या द्रुष्टीने “पाटण तालुका सामाजिक ऐक्य समिती” स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही कारणास्तव कुठे जातीय वाद निर्माण झाल्यास हा वाद प्रथम सामाजिक ऐक्य समिती समोर आणला जाणार आहे. कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन समिती मार्फत या वादाची शहानिशा करून ऐकोपाने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र विनाकारण कोणी वाद घडवून आणून समोरच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केल्यास असा अन्याय हि समिती खपवून घेणार नाही. अशा वेळी हि समिती ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या बाजूने उभी राहून त्याला कायदेशीर बाबीने मदत करेल. मग तो कोणत्याही समाजाचा असो. यासह समाजिक सलोख्याच्या इतर मुद्यावर देखील या बैठकीत चर्चा होणार असून आहे. असे मराठा – क्रांती बहुजन मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले.