साताराः 1 जुलै 2017 पासून देशभरात जी.एस.टी. कायदा आता अस्तित्वात आला आहे. या घटनेला आता 2 वर्षे पूर्ण होत आहेत. हा कायदा आता व्यापारी वर्गाला बर्यापैकी कळाला आहे. पण सामान्य माणसालादेखील तसेच विद्यार्थी वर्गालादेखील हा कायदा पूर्णपणे समजावा या उद्देशाने ड. विनायक आगाशे यांनी असा आहे जी.एस.टी. कायदा हे पुस्तक लिहले आहे. या लिहलेल्या पुस्तकावर आधारित जी.एस.टी. कायद्यावर चर्चासत्र आयोजित केले आहे.
या चर्चात्रात सी.ए. श्री. संजय मेहता, जेष्ठ कर सल्लागार रविंद्र सरडे आणि चैतन्य सडेकर तसेच जी.एस.टी. सल्लागार संघटनेचे सेक्रेटरी श्री. सुभाष कथले भाग घेणार आहेत. तरी सर्व सभासद मंडळींनी मंगळवार दि. 4 जून रोजी संध्याकाळी 7.30 वाजता संघटनेच्या ऑफीसमध्ये उपस्थित रहावे असे पत्रक संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रविण शहा यांनी काढले आहे.
जी.एस.टी. कायद्याच्या पुस्तकावर आधारित चर्चासत्र
RELATED ARTICLES