Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीवाई तालुक्याचा विकास फक्त शिवसेनाच करणार : प्रा.नितीन बानुगडे (पाटील)

वाई तालुक्याचा विकास फक्त शिवसेनाच करणार : प्रा.नितीन बानुगडे (पाटील)

वाई : विकास कामात राजकारणाला थारा न देणारी शिवसेना नेहमीच 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण करीत असते, अशी शिकवण हिंदुहृदय दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची असल्याने वाई, तालुक्यात विकास कामांचा झपाटा चालू केला आहे.वाई तालुक्याचा विकास फक्त शिवसेनाच करू शकते असे, प्रतिपादन कृष्णा खोर्‍याचे उपाध्यक्ष व सांगली, सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख-प्रा.नितीन बानुगडे (पाटील)यांनी बावधन येथील बसस्थानकाचे भूमिपूजन समारंभात बोलताना केले. बावधन बसस्थानक उभारणीच्या कामाला शिवसेनेचे विवेक भोसले व पदाधिकार्यांनी पाठपुरावा केला होता त्याला यश आल्याने राज्याचे परिवहन मंत्री- ना.दिवाकर रावते यांच्या फंडातून 16 लाख पन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने या कामाचा व बावधनमधील विविध विकास कामांचा शुभारंभ,छ. शिवाजी महाराज चौक ते कणूर रस्ता डांबरीकरण,भैरवनाथ मंदिर येथील हँमॅक्स लॅम्प लोकार्पणप्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.महिला जिल्हासंघटक-. सौ. शारदा जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे जिल्हा नियोजन समिती सदस्य- महेश शिंदे, तालुकाध्यक्ष- अनिल शेंडे, संतोष भोसले, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा- अरुणादेवी पिसाळ, प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक-श्रीमती विजयाताई भोसले, वाईशहर प्रमुख- गणेश जाधव, हनुमंत कचरे, संजय कोहिले, विवेक भोसले, किरण खामकर कोमल गांधी अनिल शेंडे, विजय बडे,तानाजी पिसाळ, दिलीप पवार, बेबी राजपुरे, विशाल राजपुरे, प्रदीप भोसले,प्रकाश जाधव,किसन राजपुरेयांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा.नितीन बानुगडे पाटील म्हणाले, जिल्हा नियोजन समितीतून लाखो रुपयांचा निधी वाई तालुक्यातील विकास कामांसाठी टाकण्यात आला आहे, 1995 साली युतीच्या शासन काळात अपक्ष आप्पानी सूतगिरणी,नागेवाडीधरणाची उभारणी करण्यात आली परंतु धरणाच्या कालव्यांचे काम अपूर्णच राहिले, शिवारात पाणी खळखण्यासाठी युतीच्या उमेदवाराला निवडून आणा, 2020 मध्ये पोटपाटासाठी 1कोटी 70 लाख तरतूद करणार असेही आश्वासन पाटील यांनी दिले. तालुक्याचा विकास फक्त शिवसेनाच करणार, प्रस्थापितांनी विकासाच्या वल्गनाच कराव्यात असे पाटील म्हणाले, गेली कित्येकवर्षात प्रस्थापितांनी जनतेला भुलवीत ठेवण्यापलीकडे काहीही केले नाही. प्रत्येक गावात दोन गट पाडून भावा-भावात भांडणे लावण्यापलीकडे तालुक्याच्या आमदारांनी कायदिवे लावले!गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र राज्यातील युती सरकारच्या माध्यमातून आलेल्या निधीवर स्वतःच्या पक्षाचा निधी असल्याचा आविर्भाव आणून जनतेची दिशाभूल करण्यापलीकडे त्यांना काही विकास करता आला नाही. अशी पाटील यांनी खरमरीत टीका केली.दुसर्‍याच्या कामाचे श्रेय स्वतःचे असल्याचे चुकीचे काम शिवसेना कधीही करणार नाही, युती सरकारच्या माध्यमातून पाच वर्षात आलेल्या निधीचा लेखाजोखा लवकरच मांडणार असल्याचेही नियोजन समिती सदस्य- महेश शिंदे यांनी जाहीर केले. शिवसेना जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्यासाठी कधीही तयार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यावेळी सौ.शारदा जाधव, यशवंत घाडगे, अनिल शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीदास पिसाळ यांनी केले. विवेक भोसले, यांनी आभार मानले यावेळी बावधन पंचकृशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular