कोरेगाव: ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या ग्रामपंचायत कर्मचार्यांबाबत राज्य शासनाची भूमिका ही उदासीन असून, गेली अनेक वर्षे या कर्मचार्यांवर अन्याय सुरु आहे.
शासनाच्या चुकीच्या भूमिकेच्या निषेधार्थ यावर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत राज्यभरातील 60 हजार ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या कुटुंबियांसह बहिष्कार टाकणार आहेत. त्याचबरोबर विविध मार्गांनी आंदोलन छेडणार आहेत.
कोरेगाव तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे अध्यक्ष महेंद्र घाडगे, कार्याध्यक्ष तुषार कुंभार, सचिव अजय वाघ, सहसचिव भिकू निकम, खजिनदार युवराज खंडाईत, अधिक बडदे, देवानंद धोत्रे, अमर शिकलकर, संचालक शंकर पवार, पोपट चव्हाण, किशोर करपे, हनुमंत माने, सातारा तालुका विभागीय उपाध्यक्ष चंद्रकांत राऊत, प्रकाश कोकाटे यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी तहसीलदार रोहिणी शिंदे यांना सोमवारी निवेदन सादर केले आणि युनियनची भूमिका पटवून दिली.
महेंद्र घाडगे म्हणाले की, राज्यातील 60 हजार ग्रामपंचायत कर्मचार्यांना राज्य शासनाने वेतनश्रेणी व पेन्शन दिलेली नाही. याबाबत वारंवार मागणी करुन देखील शासनाने दखल घेतलेली नाही.
विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर विधीमंडळाच्या अधिवेशन काळात आमरण उपोषण करण्यात येणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. युनियनची भूमिका राज्य शासनापर्यंत पोहोचविण्याची ग्वाही तहसीलदार सौ. शिंदे यांनी दिली.
कोरेगाव तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा
RELATED ARTICLES

